शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची कार येत होती. अशातच या दोन्ही वाहनांच्या समोर रोह्यांचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : भरधाव कार आणि दुचाकीसमोर अचानक रोह्याचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच दोन्ही वाहनांत धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात हिंगणघाट-कानगाव मार्गावर रविवारी दुपारी झाला. दुचाकीवरील दोघेही लग्नसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वितरीत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला, हे विशेष.भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची कार येत होती. अशातच या दोन्ही वाहनांच्या समोर रोह्यांचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार आणि दुचाकीत जबर धडक झाली.  यात भगवान मरस्कोल्हे व जागो कोडापे यांचा मृत्यू झाला तर कारचालक स्नेहल रेवतकर (३२) हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जमादर संजय रिठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात