शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची कार येत होती. अशातच या दोन्ही वाहनांच्या समोर रोह्यांचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : भरधाव कार आणि दुचाकीसमोर अचानक रोह्याचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच दोन्ही वाहनांत धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात हिंगणघाट-कानगाव मार्गावर रविवारी दुपारी झाला. दुचाकीवरील दोघेही लग्नसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वितरीत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला, हे विशेष.भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची कार येत होती. अशातच या दोन्ही वाहनांच्या समोर रोह्यांचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार आणि दुचाकीत जबर धडक झाली.  यात भगवान मरस्कोल्हे व जागो कोडापे यांचा मृत्यू झाला तर कारचालक स्नेहल रेवतकर (३२) हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जमादर संजय रिठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात