शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कृषीच्या वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात

By admin | Updated: May 9, 2017 01:03 IST

राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

गावांनाही भारनियमनाचे चटके : महावितरणने लक्ष देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. वीजे अभावी गावाकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तर पुरेसा पुरवठा होत नसल्याने कृषी क्षेत्राच्या वीज पुरवठ्यात दोन तासांनी कपात करण्यात आली आहे. पूर्वी कृषी क्षेत्राकरिता १० तास वीज देण्यात येत होती. ती आता आठ तास करण्यात आली आहे. यात रात्री आठ आणि दिवसा आठ तास नियमित वीज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत मात्र दिवस सोडा रात्रीही वीज राहत नसल्याचे दिसून आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून आले आहे. वीज निर्मितीत वाढ होईपर्यंत नागरिकांना भारनियमनाचे चटके सहन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने भाजीवर्गीस पिके संकटात आली आहेत. पवनारात केळीच्या बागा संकटात लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : पवनार परिसरात गत काही दिवसांपासून भारनियमनाने डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ओलीत करणे अवघड जात आहे. यामुळे वाढते उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून पिके कोमेजत आहे. आता महावितरणही शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार काय, असा प्रश्न होत आहे. या गावात कृषी फिडरचाच नाही तर गावातील वीज पुरवठाही नेहमी खंडीत होत असल्याचे दिसून आले. यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात घरी चटके सहन करण्याची वेळ आली आहे. या भागात बागायतदार शेतकरी आहेत. अनेकांच्या शेतात केळीचे पीक आहे. सध्या ते लहान असल्याने त्याला पाण्याची गरज आहे. परंतु येथे भारनियमन असल्याने या पिकांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांची चांगलीच अडचण आहे. शासनाने दिलेल्या सिंचनाच्या सुविधेमुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी असताना ते पिकांना देणे कठीण झाले आहे. पाणी नसल्याने तळपत्या उन्हामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. यात शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. उन्हामुळे शेतात असलेली केळीचे झाडे जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताकरिता नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. वीज निर्मितीत घट होत आहे. शिवाय जिल्ह्यात वादळ जोर काढत आहे. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र आता तो सुरळीत झाला आहे. पवनार भागात कृषी पंपांना नियमित वीज मिळत आहे. - सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा