शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कृषीच्या वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात

By admin | Updated: May 9, 2017 01:03 IST

राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

गावांनाही भारनियमनाचे चटके : महावितरणने लक्ष देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. वीजे अभावी गावाकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तर पुरेसा पुरवठा होत नसल्याने कृषी क्षेत्राच्या वीज पुरवठ्यात दोन तासांनी कपात करण्यात आली आहे. पूर्वी कृषी क्षेत्राकरिता १० तास वीज देण्यात येत होती. ती आता आठ तास करण्यात आली आहे. यात रात्री आठ आणि दिवसा आठ तास नियमित वीज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत मात्र दिवस सोडा रात्रीही वीज राहत नसल्याचे दिसून आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून आले आहे. वीज निर्मितीत वाढ होईपर्यंत नागरिकांना भारनियमनाचे चटके सहन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने भाजीवर्गीस पिके संकटात आली आहेत. पवनारात केळीच्या बागा संकटात लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : पवनार परिसरात गत काही दिवसांपासून भारनियमनाने डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ओलीत करणे अवघड जात आहे. यामुळे वाढते उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून पिके कोमेजत आहे. आता महावितरणही शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार काय, असा प्रश्न होत आहे. या गावात कृषी फिडरचाच नाही तर गावातील वीज पुरवठाही नेहमी खंडीत होत असल्याचे दिसून आले. यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात घरी चटके सहन करण्याची वेळ आली आहे. या भागात बागायतदार शेतकरी आहेत. अनेकांच्या शेतात केळीचे पीक आहे. सध्या ते लहान असल्याने त्याला पाण्याची गरज आहे. परंतु येथे भारनियमन असल्याने या पिकांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांची चांगलीच अडचण आहे. शासनाने दिलेल्या सिंचनाच्या सुविधेमुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी असताना ते पिकांना देणे कठीण झाले आहे. पाणी नसल्याने तळपत्या उन्हामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. यात शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. उन्हामुळे शेतात असलेली केळीचे झाडे जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताकरिता नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. वीज निर्मितीत घट होत आहे. शिवाय जिल्ह्यात वादळ जोर काढत आहे. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र आता तो सुरळीत झाला आहे. पवनार भागात कृषी पंपांना नियमित वीज मिळत आहे. - सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा