शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पाच बड्या कंपन्यांवर अडीच कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग मार्च अखेरीस करणार पाणी बंद

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे. हा कर त्यांनी वेळीच न भरल्यास मार्च अखेरीस त्यांचे पाणी पाटबंधारे विभाग बंद करणार असून सध्या त्याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा नगर परिषदेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महात्मा सहकारी साखर कारखाना, उत्तम व्हॅल्यू स्टिल लि.मी., मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव आदी कंपन्या करून त्याचा वापर करतात. त्यांच्याकडून पाटबंधारे विभाग पाणी पट्टीकर घेतो. परंतु, २८ फेबु्रवारीपर्यंत जामणी येथील महात्मा सहकारी साखर कारखाना ५० लाख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धा ३.१८ लाख, व्यवस्थापक मध्य रेल्वे वर्धा ८.२४ लाख, नगर परिषद वर्धा १४.६२ लाख, मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी १२७.३४ लाख, ग्रा. पं. पवनार ०.३५ लाख, ग्रा.पं. आंजी ०.९३ लाख, मे. बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल बल्लारशाह ५७.३९ लाख, नगर परिषद राजुरा ०.९५ लाख, मे. आय.एस.एम.टी. कंपनी केळी ५७.६० लाख, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव ११.९८ लाखांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.थकबाकीदार कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत सदर थकबाकीची रक्कम पाटबंधारे विभागाला अदा न केल्यास त्यांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया सध्या पाटबंधारे विभागाकडून पूर्ण केली जात असून पाणी बंद केल्यास या कंपन्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या विषयी लक्ष देण्याची गरज आहे.सिंचनाची १० लाख तर बिगर सिंचनाची ४ लाख कोटी वसुलीपाटबंधारे विभागाला यंदाच्या वर्षी पाणीपट्टी कराची सिंचनाच्या वसुलीचे ४० लाखांचे तर बिगर सिंचनाच्या वसुलीचे ३.५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर पाटबंधारे विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत बिगर सिंचनाची ४ कोटींची तर सिंचनाची १० लाखांची वसुली केली आहे.विविध कंपन्यांवर पाणीपट्टी कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यांनी वेळीच कराचा भरणा करावा, यासाठी त्यांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. कंपन्यांनी वेळीच कर न भरल्यास त्यांचे पाणी बंद करण्याचे विचाराधीन आहे.- एस. बी. काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.