शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पाच बड्या कंपन्यांवर अडीच कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग मार्च अखेरीस करणार पाणी बंद

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे. हा कर त्यांनी वेळीच न भरल्यास मार्च अखेरीस त्यांचे पाणी पाटबंधारे विभाग बंद करणार असून सध्या त्याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा नगर परिषदेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महात्मा सहकारी साखर कारखाना, उत्तम व्हॅल्यू स्टिल लि.मी., मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव आदी कंपन्या करून त्याचा वापर करतात. त्यांच्याकडून पाटबंधारे विभाग पाणी पट्टीकर घेतो. परंतु, २८ फेबु्रवारीपर्यंत जामणी येथील महात्मा सहकारी साखर कारखाना ५० लाख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धा ३.१८ लाख, व्यवस्थापक मध्य रेल्वे वर्धा ८.२४ लाख, नगर परिषद वर्धा १४.६२ लाख, मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी १२७.३४ लाख, ग्रा. पं. पवनार ०.३५ लाख, ग्रा.पं. आंजी ०.९३ लाख, मे. बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल बल्लारशाह ५७.३९ लाख, नगर परिषद राजुरा ०.९५ लाख, मे. आय.एस.एम.टी. कंपनी केळी ५७.६० लाख, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव ११.९८ लाखांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.थकबाकीदार कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत सदर थकबाकीची रक्कम पाटबंधारे विभागाला अदा न केल्यास त्यांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया सध्या पाटबंधारे विभागाकडून पूर्ण केली जात असून पाणी बंद केल्यास या कंपन्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या विषयी लक्ष देण्याची गरज आहे.सिंचनाची १० लाख तर बिगर सिंचनाची ४ लाख कोटी वसुलीपाटबंधारे विभागाला यंदाच्या वर्षी पाणीपट्टी कराची सिंचनाच्या वसुलीचे ४० लाखांचे तर बिगर सिंचनाच्या वसुलीचे ३.५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर पाटबंधारे विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत बिगर सिंचनाची ४ कोटींची तर सिंचनाची १० लाखांची वसुली केली आहे.विविध कंपन्यांवर पाणीपट्टी कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यांनी वेळीच कराचा भरणा करावा, यासाठी त्यांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. कंपन्यांनी वेळीच कर न भरल्यास त्यांचे पाणी बंद करण्याचे विचाराधीन आहे.- एस. बी. काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.