शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोहता मिलच्या सव्वाशे कामगारांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:28 IST

हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता माजी आमदार राजु तिमांडे यांनी कामगारांसह कामगारमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देकपडा खाता केला बंद : माजी आमदाराचे न्यायासाठी कामगार मंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता माजी आमदार राजु तिमांडे यांनी कामगारांसह कामगारमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.हिंगणघाट येथील मोहता मिलला १२५ वर्षाचा इतिहास आहे. मोहता ग्रुपने या मिलच्या भरोशावरच गिमाटेक्स हिंगणघाट, गिमाटेक्स वणी, पी.व्ही.टेक्सटाईल्स जांब, आर.एस.आर.मोहता मिल्स बुरकोणी आदी कंपन्या उभ्या केल्या आहे. या सर्व कंपन्या अद्ययावत असून चांगल्या प्रकारे कामकाज सुरु आहे. या कंपन्यांच्या विकासाला कामगारांच्या कष्टाने चालना मिळला आहे. पण, आता सहा महिन्यापासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना जाणीवपूर्वक काम दिले जात नाही. तसेच अन्य विभागातही कॉप्लीमेंट असूनही काम मिळत नाही. विशेषत: वीस वर्षांपासून या कामगारांना कायम केले नाही. दोन महिन्यापासून या सव्वाशे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच ले-आॅफ देण्यात येतो परंतु कामगारांना ले-आॅफचे वेतन दिले जात नाही.बदली कामगारांना रिटर्न देण्यात येते पण, रिटर्नचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे या कामागारांच्या परिवाराचा उदनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मिल व्यवस्थापन युनियनची बैठक बोलवाहिंगणघाट येथील मोहता मिलमधील कामगारांच्या समस्येबाबत मुंबई येथे मिल व्यवस्थापन युनियन पदाधिकारी, आमदार व खासदार यांची संयुक्त बैठक बोलावून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी माजी आमदार तिमांडे यांनी पक्षनेते शरदचंद्र पवार व अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटीतून केली आहे. आता कामगारांचे लक्ष न्यायाकडे लागले आले.