शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विसाव्या पशुगणनेत जिल्ह्यातील पशुधन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.

ठळक मुद्देवाढत्या शहरीकरणाचा परिणाम : शेळ्या-मेंढ्यांची संख्याही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने झालेल्या २०व्या पशुगणनेत पाळीव पशुंच्या संख्येत घट झालेली आहे. झपाट्याने होत असलेले शहरीकरण, चारा सोडून नगदी पिके घेण्याकडे असलेला शेतकऱ्यांचा कल याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा जोडधंदा केला जातो. यातून घरखर्च बऱ्यापैकी निघतो. मात्र, उन्हाळ्यात भासणारी वैरण टंचाई, पशुखाद्याचे गगनाला भिडणारे दर यामुळेही पशुपालनात घट होत असल्याचे दिसून येते. देशात जनगणना दर दहा वर्षांनी तर पशुगणना दर पाच वर्षांनी होते. १९ वी पशुगणना २०१२ मध्ये पूर्ण झाली. २०१२ च्या १९ व्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गार्इंची संख्या ३ लाख ४ हजार ३५९, म्हशी ४८ हजार ७९३, शेळ्या १ लाख ३० हजार ३४२, मेंढ्या १ हजार ६८५, वराहांची संख्या २ हजार ८१० इतकी होती.विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.जिल्ह्यात पशुधनाची संख्या प्रशासनाच्या लेखी घटती असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन घेतले जाते. त्यामुळे विसाव्या पशुगणनेनुसारच जिल्ह्यात पाळीव जनावरांची संख्या असल्याने १९ व्या पशुगणनेनुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाची दर्शविली जाणारी आकडेवारी साशंकता निर्माण करणारी ठरत आहे.गार्इंच्या संख्येत २८ तर म्हशींच्या संख्येत २ हजारांनी झाली घट१९ व्या पशुगणनेच्या तुलनेत संकरित आणि देशी गार्इंची संख्या २८ हजार ४७९, तर म्हशींच्या संख्येत २ हजार १४४ ने घट झालेली आहे. मात्र, शेळ्यांच्या संख्येत ३१ हजार १७, तर मेंढ्यांच्या संख्येत ३ हजार ६७३ ने वाढ झालेली असल्याने शेतकºयांचा पशुपालनासोबतच शेळीपालनाकडेही मोठा कल दिसून येत आहे.

टॅग्स :cowगाय