शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५३.७८ कोटी वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:15 IST

सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती.

ठळक मुद्देतुडतुड्यासह गुलाबी बोंडअळीचे अनुदान वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती. त्या अनुषंगाने १५३.७८ कोटींची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ती एकूण तीन टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०० टक्के वळती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.प्राप्त माहितीनुसार, २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने तसेच तुडतुड्यामुळे वर्धा तालुक्यातील ३० हजार ७७९, सेलू तालुक्यातील २६ हजार ३६७, देवळी तालुक्यातील २९ हजार ५९१, हिंगणघाट तालुक्यातील ३५ हजार १६०, समुद्रपूर तालुक्यातील ३२ हजार ६६७, आर्वी तालुक्यातील २१ हजार ५८२, आष्टी तालुक्यातील १६ हजार ४९९ तर कारंजा (घा.) तालुक्यातील २० हजार ३०७ शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले होते.कृषी विभाग आणि महसूल विभागाने पाहणीअंती वर्धा जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ क्षेत्रावरील नुकसान झाल्याच्या विषयावर शिक्का मोर्तब केला होता. त्यानंतर सरकारकडे सदर नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०१८ व ८ मे २०१८ च्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाल्यानंतर तो जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर तीन टप्प्यात त्याचे वितरण करण्यात आले आहे. असे असले तरी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही सदर अनुदानाची रक्कम वळती झाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.२ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना दिलासासर्वेक्षणाअंती जिल्हा प्रशासनाने २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासाठी पात्र ठरवित त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल शासनला पाठविला होता. त्यानंतर निधी मंजूर होत तो जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.७९६ रुपयांची कपातजिल्ह्यातील २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार करून १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार ७९६ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, शासनाने १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये मंजूर करून तितकाच निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. एकूणच ७९६ रुपयांच्या निधीची कपात करण्यात आली आहे.