शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५३.७८ कोटी वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:15 IST

सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती.

ठळक मुद्देतुडतुड्यासह गुलाबी बोंडअळीचे अनुदान वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती. त्या अनुषंगाने १५३.७८ कोटींची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ती एकूण तीन टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०० टक्के वळती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.प्राप्त माहितीनुसार, २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने तसेच तुडतुड्यामुळे वर्धा तालुक्यातील ३० हजार ७७९, सेलू तालुक्यातील २६ हजार ३६७, देवळी तालुक्यातील २९ हजार ५९१, हिंगणघाट तालुक्यातील ३५ हजार १६०, समुद्रपूर तालुक्यातील ३२ हजार ६६७, आर्वी तालुक्यातील २१ हजार ५८२, आष्टी तालुक्यातील १६ हजार ४९९ तर कारंजा (घा.) तालुक्यातील २० हजार ३०७ शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले होते.कृषी विभाग आणि महसूल विभागाने पाहणीअंती वर्धा जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ क्षेत्रावरील नुकसान झाल्याच्या विषयावर शिक्का मोर्तब केला होता. त्यानंतर सरकारकडे सदर नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०१८ व ८ मे २०१८ च्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाल्यानंतर तो जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर तीन टप्प्यात त्याचे वितरण करण्यात आले आहे. असे असले तरी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही सदर अनुदानाची रक्कम वळती झाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.२ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना दिलासासर्वेक्षणाअंती जिल्हा प्रशासनाने २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासाठी पात्र ठरवित त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल शासनला पाठविला होता. त्यानंतर निधी मंजूर होत तो जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.७९६ रुपयांची कपातजिल्ह्यातील २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार करून १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार ७९६ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, शासनाने १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये मंजूर करून तितकाच निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. एकूणच ७९६ रुपयांच्या निधीची कपात करण्यात आली आहे.