शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओबीसींची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:49 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम ३४० अन्वये ओबीसींना २६ टक्के आरक्षण, शिष्यवृत्ती व सवलती द्यावे. तो ओबीसी समाजाचा अधिकार आहे, असे नमूद केले आहे.

ठळक मुद्देआरक्षणावर घाला : राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम ३४० अन्वये ओबीसींना २६ टक्के आरक्षण, शिष्यवृत्ती व सवलती द्यावे. तो ओबीसी समाजाचा अधिकार आहे, असे नमूद केले आहे. कलम ३४९ नुसार एससी, एसटी व इतर बांधवांचे शिक्षण, नोकरीत आरक्षण निश्चित केले आहे; पण भाजपा सरकार सत्तेत येताच ओबीसी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील ५० टक्के शिष्यवृत्ती बंद झाली. यामुळे विद्यार्थी अडचणीत आले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन देत याचा निषेध नोंदविला आहे.ओबीसींची शिष्यवृत्ती बंद झाल्याने कष्टकरी, शेतकरी असलेल्या हुशार व उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. अनेकांना उच्च शिक्षण सोडावे लागत आहे. ओबीसी गरीब विद्यार्थी उच्च शिक्षणाला प्रवेश घेण्यापासून वंचित झाले आहेत. ओबीसी मुलांना केंद्र व राज्य शासन ६०० कोटी रुपये शिष्यवृत्ती देत होते. ती शासनाने ५८ कोटी केली. यामुळे राज्यातील १० लाख ओबीसी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. चालू शैक्षणिक वर्षात तर शासनाने वैद्यकीय शिक्षणातून होतकरू व नेट परीक्षा उत्तीर्ण ओबीसी विद्यार्थ्यांना हद्दपारच केले आहे. राज्य शासनाच्या अंतर्गत येणाºया वैद्यकीय महाविद्यालयात २७ टक्के ओबीसी आरक्षण कोट्यात प्रवेश देण्यात आला नाही. ओबीसीचे आरक्षण शून्य टक्के केले. केंद्र शासनाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयात २ टक्के ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. हा देशातील ओबीसी समाजावर अन्याय आहे. शासन ओबीसी, एससी, एसटीचे आरक्षण संपवित आहे. राष्ट्रवादी काँगे्रस ओबीसी विभागाने याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविला. निवेदन देताना विनय डहाके, रामदास कुबडे, भरत चौधरी, मोरेश्वर तेलरांधे, विलास तायवाडे, नरेश कुटे आदी उपस्थित होते.