शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

उष्णतामानाने संत्राबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:39 IST

गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या उष्णतामानामुळे संत्रा, मोसंबी आदींची झाड करपत असल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय तशी मागणी परिसरातील संत्रा उत्पादकांची आहे.गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी राहिला. परंतु, आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्यात आल्याने संध्या या भागातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे बागा वाचविण्यासाठी जीवाचे रान शेतकऱ्यांना करावे लागत आहे. काही बागायतदार पाणी विकत घेऊन टँकरने ते विहिरीत टाकत आहेत. तर हेच विहिरीतील पाणी सध्या या संत्रा व मोसंबीच्या झाडांना देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे सुर्यनारायणही चांगलाच आग ओकू पाहत आहे. त्यामुळे संत्राचे झाड खाली माना टाकत आहेत. यंदा वेळीच पाऊस न झाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.जोरदार पाऊस येण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा, असा प्रश्न बागायतदारांपुढे उभा आहे. या भागातील बागा वाढत्या उन्हामुळे करपत असल्याने कृषी विभागाच्यावतीने सदर बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तशी शेतकऱ्यांची मागणीही आहे.शासकीय मदतीची मागणीसंत्रा, मोसंबी, बागावर नेहमीच येणाऱ्या किडीमुळे बागायतदारांना महागडी किटकनाशके विकत घेवून त्यांची फवारणी करावी लागते. शिवाय मजूरीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने बागायतदार मेटाकुटीस आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांना मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. वाढत्या उन्हासह पाण्याचा कमतरतेमुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.