शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

उष्णतामानाने संत्राबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:39 IST

गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या उष्णतामानामुळे संत्रा, मोसंबी आदींची झाड करपत असल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय तशी मागणी परिसरातील संत्रा उत्पादकांची आहे.गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी राहिला. परंतु, आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्यात आल्याने संध्या या भागातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे बागा वाचविण्यासाठी जीवाचे रान शेतकऱ्यांना करावे लागत आहे. काही बागायतदार पाणी विकत घेऊन टँकरने ते विहिरीत टाकत आहेत. तर हेच विहिरीतील पाणी सध्या या संत्रा व मोसंबीच्या झाडांना देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे सुर्यनारायणही चांगलाच आग ओकू पाहत आहे. त्यामुळे संत्राचे झाड खाली माना टाकत आहेत. यंदा वेळीच पाऊस न झाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.जोरदार पाऊस येण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा, असा प्रश्न बागायतदारांपुढे उभा आहे. या भागातील बागा वाढत्या उन्हामुळे करपत असल्याने कृषी विभागाच्यावतीने सदर बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तशी शेतकऱ्यांची मागणीही आहे.शासकीय मदतीची मागणीसंत्रा, मोसंबी, बागावर नेहमीच येणाऱ्या किडीमुळे बागायतदारांना महागडी किटकनाशके विकत घेवून त्यांची फवारणी करावी लागते. शिवाय मजूरीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने बागायतदार मेटाकुटीस आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांना मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. वाढत्या उन्हासह पाण्याचा कमतरतेमुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.