शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

उष्णतामानाने संत्राबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:39 IST

गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या उष्णतामानामुळे संत्रा, मोसंबी आदींची झाड करपत असल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय तशी मागणी परिसरातील संत्रा उत्पादकांची आहे.गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी राहिला. परंतु, आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्यात आल्याने संध्या या भागातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे बागा वाचविण्यासाठी जीवाचे रान शेतकऱ्यांना करावे लागत आहे. काही बागायतदार पाणी विकत घेऊन टँकरने ते विहिरीत टाकत आहेत. तर हेच विहिरीतील पाणी सध्या या संत्रा व मोसंबीच्या झाडांना देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे सुर्यनारायणही चांगलाच आग ओकू पाहत आहे. त्यामुळे संत्राचे झाड खाली माना टाकत आहेत. यंदा वेळीच पाऊस न झाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.जोरदार पाऊस येण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा, असा प्रश्न बागायतदारांपुढे उभा आहे. या भागातील बागा वाढत्या उन्हामुळे करपत असल्याने कृषी विभागाच्यावतीने सदर बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तशी शेतकऱ्यांची मागणीही आहे.शासकीय मदतीची मागणीसंत्रा, मोसंबी, बागावर नेहमीच येणाऱ्या किडीमुळे बागायतदारांना महागडी किटकनाशके विकत घेवून त्यांची फवारणी करावी लागते. शिवाय मजूरीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने बागायतदार मेटाकुटीस आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांना मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. वाढत्या उन्हासह पाण्याचा कमतरतेमुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.