शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: May 23, 2017 01:07 IST

जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे.

शिक्षण हक्क परिषदेचे साखळी उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय शासनाकडून आदिवासी आश्रम शाळा, सरकारी आदिवासी वसतिगृहे बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शासनाच्या धोरणाविरूद्ध शिक्षण हक्क संघटना मंगळवारपासून साखळी उपोषण करीत आहे.मारोती उईके यांनी आरटीआय अंतर्गत घेतलेल्या माहितीनुसार आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वर्ष २०१५-१६ ची शिष्यवृत्तीचे २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये दोन वर्षांपासून नागपूर येथील आदिवासी विभागाने रवाना केले आहे. हा निधी वर्धा जिल्हा परिषदेकडे पडून होता. आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांची यादी न मिळाल्याने सदर निधी तसाच असल्याचे जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांचे मत आहे. २०१६-१७ या शैक्षणिक सत्राची १ कोटी ४८ लाख रुपये शिष्यवृत्ती मार्च २०१७ पर्यंत विद्यार्थ्यांना वितरित करायला पाहिजे होती; पण सत्र संपल्यानंतरही निधी जि.प. कडे पडून आहे. जिल्हा परिषदेत विचारणा केल्यास आदिवासी विभाग आम्हाला यादी पाठवित नाही. आदिवासी विभागाला विचारणा केल्यास शिक्षण विस्तार अधिकारी आम्हाला याद्या पाठवित नाही, असे एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार होत आहे. इयत्ता अकरावी, बारावी व पदवीधर शिक्षण घेणारे हजारो आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी जि.प. कडे असून तो दुसऱ्या गैर आदिवासी योजनांत लावला जातो. याबाबत लोकप्रतिनिधी व शासन उदासिन दिसून येते. याविरूद्ध एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेचे संयोजक मारोती उईके यांच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवारपासून शासन-प्रशासन व आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या विरोधात साखळी उपोषण करणार असून निवेदन दिले आहे.