शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आदिवासी बहुल गावाचा विकास साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:07 IST

मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : ग्राम स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत विकास साधणार असल्याचा विश्वास, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आमगाव (जंगली) गावातील नागरिकांना दिला.सेलू तालुक्यातील आमगाव (जंगली) या आदिवासी बहुल गावात आयोजित ग्राम स्वच्छता अभियानादरम्यान मार्गदर्शन करतांना आमदार भोयर बोलत होते. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रवासी निवाऱ्याची मागणी केली होती. या मागणीची पुर्तता करीत आमदार भोयर यांनी ग्राम स्वच्छता अभियानानंतर प्रवासी निवारा व सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले. यावेळी नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आ. भोयर म्हणाले की, खोटी आश्वासन देऊन जनतेचे समाधान न करता, जी कामे करुन शकतो तेच बोलतो आणि त्यांना पुर्णत्वास नेण्याचा पूर्णपणे प्रयत्नही करतो. म्हणून गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून होणारी कामे ही दर्जेदारच झाली पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रत्येक नागरिकाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान मारोती आत्राम या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते केक कापून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे समाधानही आमदारांनी केले. कार्यक्रमाला सरपंच शोभा सराम, जिल्हा परिषद सभपती सोनाली कलोडे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा मलघाम, विनोद लाखे, उपसरपंच प्रकाश पिंपळे, विलास वरटकर, चंद्रशेखर वंजारी, ईश्वर खोबे, विजय खोडे, विलास नगराळे, स्वप्नील सराम, भारत मून, मिरा पेंदाम, पृथ्वी नगराळे, वर्षा होले, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी संजय वानखेडे, विस्तार अधिकारी सुशील बंसोड, ग्रामसेविका डोंगरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, गावातील नागरीक व तरुणांची उपस्थिती होती. यासर्वांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोदविला.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान