शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

आदिवासी दैवत रावण पूजा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:03 IST

बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआयटीआय टेकडीवरील कार्यक्रम : युवकांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूराव उईके पाटील तर अतिथी म्हणून जि.प. सदस्य सरस्वती मडावी, प्रा. शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, मंगेश शेंडे, जि.प. सदस्य धनराज तेलंग, गजेंद्र सुरकार, प्रा. नूतन माळवी, अमिर अली अजानी, ज्ञानेश्वर ढगे, मदन चावरे, प्रशांत कुत्तरमारे, राजेश मडावी, तार खंडाते, निर्मला सलामे, मेघा उईके, लता टेकाम, मनोहर पंधरे, ज्ञानेश्वर मडावी आदी उपस्थित होते.काकडे यांनी चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांची दिशाभूल करीत आहे. धर्मा-धर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करीत आहे. लिखानाद्वारे समाजप्रबोधन करणाºया व्यक्तींचे प्राण घेत त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा रावण यांचा दैदिप्यमान इतिहास असतानाही चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांच्या हाताने त्यांचे दहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. याबाबत शासनने दहन करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सरस्वती मडावी यांनी सर्व आदिवासी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरूद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. ज्या संघटना वा राजकीय पक्ष रावण दहन करीत असतील त्यांची भेट घेत त्यांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करावा. याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.तेलंग यांनी आदिवासी समाज अजून शिक्षणाच्या प्रवाहात मागे आहे. आदिवासी समाजातील युवकांनी शिक्षणाचा लाभ घेवून महत्त्वाच्या पदावर जावे. याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. त्याचप्रमाणे शासन आरक्षणाच्या बाबतीत अतिशय धोकादायक निर्णय घेतले असून शिष्यवृत्ती मिळणार नाही, याप्रमाणे कायदे बनवित आहेत. यामुळे आदिवासी समाजाने गावोगावी रावण पूजनाचा कार्यक्रम घेऊन समाज जागृती करावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मसराम यांनी, संचालन हरिदास टेकाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाला राजू मडावी, चंद्रभान खंडाते, चेतन पेंदाम, चंद्रशेखर मडावी, रामेश्वर आडे, नरेंद्र तोडासे, किशोर पेंदाम, नागोराव मसराम, विष्णू जुगनाके, मडावी, नंदकिशोर बिसने, विजय मरस्कोल्हे, अमृत मडावी, राजेंद्र मसराम, दादाराव इवनाथे, शंकर उईके, भरत कोवे, सुनील सलामे, दिगांबर पेंदाम, किसन कौरती, विठ्ठल इवनाथे, विनोद गेडाम, सचिन नराते, दिवाकर उईके, आशा टेकाम, सुनिता सयाम, अनिला मसराम, रंजना सलामे, योगिता युवनाथे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.