शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:41 IST

विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे.

ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे निघाले बोगस : अडीच लाखांचे पीक बुडाले, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे. तीन एकरातील एकाही झाडाला फुल व बोंडे लागली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या शेतकºयाने तक्रार केली; पण अधिकाºयांनी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे अडीच लाखांचे पीक बुडाले असून अख्खा संसारच उघड्यावर आला आहे. आता नुकसान भरपाई वा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.बोरखेडी येथील शेतकरी रामदास चंदीवाले यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. यासाठी महाबीजचे तीन पॉकेट बियाणे खरेदी केले. झाडांची उंची झपाट्याने वाढली; पण फुल, बोंड लागलीच नाही. यामुळे रामदास व त्यांची मुले व्यथित झालीत. त्यांनी महाबीजच्या दुकानात जाऊन माहिती दिली. यावर तक्रार करा, असा सल्ला दुकानदारांकडून देण्यात आला.यानंतर याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघाकडे तक्रार करण्यात आली. तालुका कृषी अधिकाºयांनी तक्रार मिळताच पंचनामा केला. याचा अहवाल त्वरित पाठविला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. रामदास यांनी पिकाचा विमा काढलेला नाही. यामुळे त्यांना काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचेच बियाणे बोगस निघत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. यापूर्वी काही शेतकºयांचे बियाणे बोगस निघाले होते. ते प्रारंभी बदलून देण्यात आले; पण आता पीक काढणीवर असतानाही कपाशीला बोंडेच आली नसल्याने मोठे नुकसान होत आहे.वर्षभरापासून मेहनत घेऊन तथा कर्जबाजारी होऊन अशी वेळ आल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी वा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर काय कारवाई होते, याकडे शेतकºयाचे लक्ष लागले आहे.पीक विमा न काढल्याने नाकारली मदतमागील हंगामात पीक विमा योजनेत शेतकºयांची फसगत झाली. यामुळे अनेक शेतकºयांनी यंदा पीक विमा काढलेला नाही. आता बियाणे बोगस निघाल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकºयाला महाबीजने वा शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे; पण विमा काढला नसल्याचे कारण पूढे केले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत महाबीजने भरपाई देणे गरजेचे आहे.रामदास चंदीवाले या शेतकºयाने तीन एकरात महाबीज बियाणे लावले आहे. कपाशीचे झाड पूर्ण वाढले; पण फुले व बोंडे लागली नाहीत. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. यात खते व फवारणीचे प्रमाण बरोबर दिले नसेल. त्यामुळे वाढ झाली व फळ धारणेची प्रक्रिया खुंटली असेल. याची चौकशी सुरू आहे.- अजय फुलझेले, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.