शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:41 IST

विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे.

ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे निघाले बोगस : अडीच लाखांचे पीक बुडाले, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे. तीन एकरातील एकाही झाडाला फुल व बोंडे लागली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या शेतकºयाने तक्रार केली; पण अधिकाºयांनी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे अडीच लाखांचे पीक बुडाले असून अख्खा संसारच उघड्यावर आला आहे. आता नुकसान भरपाई वा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.बोरखेडी येथील शेतकरी रामदास चंदीवाले यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. यासाठी महाबीजचे तीन पॉकेट बियाणे खरेदी केले. झाडांची उंची झपाट्याने वाढली; पण फुल, बोंड लागलीच नाही. यामुळे रामदास व त्यांची मुले व्यथित झालीत. त्यांनी महाबीजच्या दुकानात जाऊन माहिती दिली. यावर तक्रार करा, असा सल्ला दुकानदारांकडून देण्यात आला.यानंतर याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघाकडे तक्रार करण्यात आली. तालुका कृषी अधिकाºयांनी तक्रार मिळताच पंचनामा केला. याचा अहवाल त्वरित पाठविला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. रामदास यांनी पिकाचा विमा काढलेला नाही. यामुळे त्यांना काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचेच बियाणे बोगस निघत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. यापूर्वी काही शेतकºयांचे बियाणे बोगस निघाले होते. ते प्रारंभी बदलून देण्यात आले; पण आता पीक काढणीवर असतानाही कपाशीला बोंडेच आली नसल्याने मोठे नुकसान होत आहे.वर्षभरापासून मेहनत घेऊन तथा कर्जबाजारी होऊन अशी वेळ आल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी वा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर काय कारवाई होते, याकडे शेतकºयाचे लक्ष लागले आहे.पीक विमा न काढल्याने नाकारली मदतमागील हंगामात पीक विमा योजनेत शेतकºयांची फसगत झाली. यामुळे अनेक शेतकºयांनी यंदा पीक विमा काढलेला नाही. आता बियाणे बोगस निघाल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकºयाला महाबीजने वा शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे; पण विमा काढला नसल्याचे कारण पूढे केले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत महाबीजने भरपाई देणे गरजेचे आहे.रामदास चंदीवाले या शेतकºयाने तीन एकरात महाबीज बियाणे लावले आहे. कपाशीचे झाड पूर्ण वाढले; पण फुले व बोंडे लागली नाहीत. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. यात खते व फवारणीचे प्रमाण बरोबर दिले नसेल. त्यामुळे वाढ झाली व फळ धारणेची प्रक्रिया खुंटली असेल. याची चौकशी सुरू आहे.- अजय फुलझेले, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.