शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:41 IST

विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे.

ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे निघाले बोगस : अडीच लाखांचे पीक बुडाले, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे. तीन एकरातील एकाही झाडाला फुल व बोंडे लागली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या शेतकºयाने तक्रार केली; पण अधिकाºयांनी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे अडीच लाखांचे पीक बुडाले असून अख्खा संसारच उघड्यावर आला आहे. आता नुकसान भरपाई वा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.बोरखेडी येथील शेतकरी रामदास चंदीवाले यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. यासाठी महाबीजचे तीन पॉकेट बियाणे खरेदी केले. झाडांची उंची झपाट्याने वाढली; पण फुल, बोंड लागलीच नाही. यामुळे रामदास व त्यांची मुले व्यथित झालीत. त्यांनी महाबीजच्या दुकानात जाऊन माहिती दिली. यावर तक्रार करा, असा सल्ला दुकानदारांकडून देण्यात आला.यानंतर याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघाकडे तक्रार करण्यात आली. तालुका कृषी अधिकाºयांनी तक्रार मिळताच पंचनामा केला. याचा अहवाल त्वरित पाठविला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. रामदास यांनी पिकाचा विमा काढलेला नाही. यामुळे त्यांना काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचेच बियाणे बोगस निघत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. यापूर्वी काही शेतकºयांचे बियाणे बोगस निघाले होते. ते प्रारंभी बदलून देण्यात आले; पण आता पीक काढणीवर असतानाही कपाशीला बोंडेच आली नसल्याने मोठे नुकसान होत आहे.वर्षभरापासून मेहनत घेऊन तथा कर्जबाजारी होऊन अशी वेळ आल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी वा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर काय कारवाई होते, याकडे शेतकºयाचे लक्ष लागले आहे.पीक विमा न काढल्याने नाकारली मदतमागील हंगामात पीक विमा योजनेत शेतकºयांची फसगत झाली. यामुळे अनेक शेतकºयांनी यंदा पीक विमा काढलेला नाही. आता बियाणे बोगस निघाल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकºयाला महाबीजने वा शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे; पण विमा काढला नसल्याचे कारण पूढे केले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत महाबीजने भरपाई देणे गरजेचे आहे.रामदास चंदीवाले या शेतकºयाने तीन एकरात महाबीज बियाणे लावले आहे. कपाशीचे झाड पूर्ण वाढले; पण फुले व बोंडे लागली नाहीत. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. यात खते व फवारणीचे प्रमाण बरोबर दिले नसेल. त्यामुळे वाढ झाली व फळ धारणेची प्रक्रिया खुंटली असेल. याची चौकशी सुरू आहे.- अजय फुलझेले, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.