शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

झाडे होताहेत आगीत स्वाहा

By admin | Updated: June 4, 2016 01:52 IST

सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ ...

जिल्ह्यात सर्वत्र हाच प्रकार : धुरे जाळताना झाडे आगीच्या भक्ष्यस्थानीवायगाव (नि.) : सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ यात शेतातील तसेच लगतची झाडेही आगीच्या स्वाधीन केली जात असल्याचे दिसते़ हा प्रकार सध्या वायगाव मार्गावरच नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. यामुळे मोठमोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी येत आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग मानवाच्या जीवनातील झाडांचे महत्त्व सांगून जातो़ शासनालाही वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व कळले आहे़ यामुळेच वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण या बाबी अद्याप शेतकऱ्यांना अवगत झाल्याचे दिसत नाही़ आजही पूर्वीप्रमाणेच शेतकरी शेतातील कचरा शेतातच जाळतात़ शिवाय धुऱ्यांनाही आग लावल्या जाते. यामुळे शेताच्या शेजारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची राखरांगोळी होताना दिसते़ काही लाकूड चोरही याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसते़ अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना आगी लावल्या जातात़ ही वृक्षे जमिनीवर कोसळली की, ते लाकून चोरून नेले जाते़ या प्रकारामुळे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते़ वायगाव मार्गावरील अनेक शेतांचे धुरे दररोज पेटविले जात असल्याचे दिसते़ यात धुऱ्यावरील वृक्ष जळत असल्याने ते जमिनीवर कोसळत आहेत़ शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन धुरे पेटविणे बंद करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)वृक्षसंवर्धनाची गरजरस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या बांधावर पूर्वी झाडे लावली जात होती़ यात आंबा, चिंच, बिहाडा आदी झाडे दिसून येत होती़ माकडांचे कळप याच झाडांवर आश्रय घेत असल्याने पिकांची नासाडी होत होती़ हा मनस्ताप दूर करण्यासाठीही शेतकरी ही झाडे कापत असल्याचे दिसते़ अनेक मार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कधी जाळली गेली तर कधी कापली़ शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी बाभूळही आता दिसत नाही़ यामुळे रोड व शेती उजाड झाली़ अनेक मोठी वृक्षेही कोसळण्याच्या मार्गावर आहे़ या वृक्षांचे संवर्धन करणेच गरजेचे झाले आहे़ या काही वर्षात रस्त्याच्या काठावर असलेली हजारो झाडे जळाली आहेत. या तुलनेत वृक्ष लागवड न झाल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.