शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विविध योजनांतर्गत वृक्ष लागवड; पण संवर्धनाला बगल

By admin | Updated: May 30, 2014 00:19 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते.

वायगाव (नि.) : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते. यामुळे वृक्ष लागवड योजनांवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. शासनाच्या योजनेनुसार एक व्यक्ती, एक वृक्ष ही संकल्पना राबविण्यात आली. वृक्ष लागवडीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पंचायत समितीमार्फत सर्व ग्रा.पं. च्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. यात वायगाव (नि.) ग्रा.पं. ने ही वृक्ष लागवड केली. वायगाव अंतर्गत येणार्‍या वॉर्ड क्र. ३ मधील आजगाव नवीन व आजगाव जुने येथे रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत लाकडी कमचीचे कठडेही लावले; पण झाडाला पाणी कोण देणार, हा प्रश्नच होता. संवर्धनाकडे ग्रा.पं. ने दुर्लक्ष केल्याचेच दिसते. झाडांना पाणी न मिळाल्याने बहुतांश झाडे वाळली आहेत. हे दृष्य पाहता शासनाची योजना राबवायची म्हणून झाडे लावण्यात आल्याचे दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाकडे झाडाला पाणी देण्याकरिता लोखंडी टाकी उपलब्ध आहे. ही टाकी सध्या धुळखात पडली असताना झाडाला पाणी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते. टाकी विकत घेतल्यापासून तिचा वापरच करण्यात आला नसल्याचेही समोर आले आहे.  यामुळे झाडांना पाणी देणार्‍या मजुराची मजुरी तर कागदोपत्री काढली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. झाडाला पाणी दिले जात असेल तर  बहुतांश झाडे का वाळत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत लावलेली झाडे वाळत असल्याने योजनाच धोक्यात आली आहे. ग्रा.पं. तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)