शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीराम मंदिरावर उगवले झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

प्राचीन श्रीराम मंदिराच्या कोट्यवधींच्या संपत्तीतून मंदिराचा व परिसराचा विकास करण्याऐवजी मंदिराची सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. मंदिरामध्ये कर्मचारी आहेत; पण नियमित साफसफाई होत नाही. येथे येणाऱ्या दर्शनार्थींकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मंदिर परिसरात सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : जिल्ह्यातील गिरड हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, येथील प्राचीन श्रीराम मंदिर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. या मंदिराकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही मंदिराच्या देखभाल दुरुस्तीकडे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मंदिरावरच झाडे उगवली आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी व निवेदने दिली; परंतु स्वयंघोषित समाजसेवक म्हणून मिरविणाऱ्या सचिवाच्या मनमानी कारभारापुढे कुणाचेही चालत नाही.प्राचीन श्रीराम मंदिराच्या कोट्यवधींच्या संपत्तीतून मंदिराचा व परिसराचा विकास करण्याऐवजी मंदिराची सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. मंदिरामध्ये कर्मचारी आहेत; पण नियमित साफसफाई होत नाही. येथे येणाऱ्या दर्शनार्थींकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मंदिर परिसरात सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे. या मंदिराच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला. त्या रस्त्यावरही या मंदिर व्यवस्थापनाने अस्वच्छता करून ठेवली आहे. मंदिरात असणाऱ्या गुरांची घाण आणि सांडपाण्यामुळे नागरिक आजारांचा सामना करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी मंदिराच्या मालकीच्या शेतात ८० हजार रुपयांचा मुरूम घोटाळा सचिवांच्या सहकाऱ्याने केल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त व पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांनी पुन्हा दबावतंत्राचा वापर करायला सुरुवात केली. या देवस्थानातील सचिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनमानी कारभार चालविला असून, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मंदिराच्या हुकूमशाही प्रशासकांना वारंवार तोंडी सूचना देऊनसुद्धा मंदिर व परिसरात कोणतीही सुधारणा करीत नाही. येथे कोणतीही सुविधा नसल्याने सर्वत्र खंडरचे रूप प्राप्त झाले आहे. घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात सुधारणा न झाल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल. - राजेंद्र शेलोरे, नागरिक. 

अतिपावसामुळे चिखल झाला आहे. त्यावर उपाय म्हणून चुरी टाकलेली आहे. गौरक्षणासाठी मंदिराच्या शेतीमध्ये व्यवस्था करण्यात येईल. शेणखताची व्यवस्था मंदिराच्या नजीकच्या शेतात करण्याचे ठरविले आहे. काही आरोप जाणीवपूर्वक करण्यात आले असून, त्यामध्ये तथ्य नाही.- बळवंत गाठे, अध्यक्ष श्रीराम मंदिर देवस्थान, गिरड.

 

टॅग्स :Templeमंदिर