शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:57 IST

प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.

ठळक मुद्देबजरंग खरमाटे : ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन, हेल्मेटच्या अनुषंगाने गुरव यांनी मांडली बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, मोटार वाहन निरीक्षक श्याम तिवसकर, विजयकुमार साळुंके, प्रशांत चिंचोळकर, विशाल भोवते, मोटार वाहन निरीक्षक सुरज पवार, मंगेश गवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार दारू पिऊन वाहन न चालविणे, धोकादायक परिस्थितीत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर न बोलने, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात लादून त्याची वाहतूक न करणे, अवैध प्रवासी वाहतूक कशी धोक्याची आहे याविषयी यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना माहिती दिली. वाहतूक नियमांना फाटा दिल्याचे लक्षात आल्याने आजपर्यंत २७० वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक दुचाकी चालकाने वाहनचालविताना सुरक्षीत प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन दत्तात्रय गुरव यांनी याप्रसंगी केले.पथनाट्यातून जनजागृतीरस्ता सुरक्षा अभियांनाच्या निमित्ताने वाहन चालवितांना हेल्मेट न वापरल्यामुळे काय होऊ शकते, याबाबत पथनाट्यातून तरुण-तरुणींनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली.