शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:57 IST

प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.

ठळक मुद्देबजरंग खरमाटे : ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन, हेल्मेटच्या अनुषंगाने गुरव यांनी मांडली बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, मोटार वाहन निरीक्षक श्याम तिवसकर, विजयकुमार साळुंके, प्रशांत चिंचोळकर, विशाल भोवते, मोटार वाहन निरीक्षक सुरज पवार, मंगेश गवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार दारू पिऊन वाहन न चालविणे, धोकादायक परिस्थितीत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर न बोलने, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात लादून त्याची वाहतूक न करणे, अवैध प्रवासी वाहतूक कशी धोक्याची आहे याविषयी यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना माहिती दिली. वाहतूक नियमांना फाटा दिल्याचे लक्षात आल्याने आजपर्यंत २७० वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक दुचाकी चालकाने वाहनचालविताना सुरक्षीत प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन दत्तात्रय गुरव यांनी याप्रसंगी केले.पथनाट्यातून जनजागृतीरस्ता सुरक्षा अभियांनाच्या निमित्ताने वाहन चालवितांना हेल्मेट न वापरल्यामुळे काय होऊ शकते, याबाबत पथनाट्यातून तरुण-तरुणींनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली.