शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

टेकडीचे पालटलेले रूप भरले शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:45 IST

शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या टेकडीवर हिरवळ फुलविली.

ठळक मुद्देआॅक्सिजन पार्कमध्ये फिरण्यास मज्जाव : व्हीजेएमचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या टेकडीवर हिरवळ फुलविली. त्याला प्रशासनाचीही मदत मिळाल्याने येथे अनेक उपक्रम राबवून आॅक्सिजन पार्क तयार करण्यात आला. मात्र, टेकडीचे पालटलेले हे रूप शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’ आले आहे. त्यांनी आता येथे मालकी हक्क गाजवायचा खटाटोप चालविला असून आॅक्सिजन पार्कमध्ये फिरण्यास मज्जाव केल्याचा आरोप वैद्यकीय जनजागृती मंचाने निवेदनातून केला आहे.निसर्गाची विस्कटलेली घडी सावरण्याकरिता कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर २०१६ पासून तहसीलदारांच्या परवानगीने श्रमदानातून जलपुर्नभरण, वृक्षारोपण व संगोपनाचे कार्य सुरू आहे. या टेकडीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याला २५० सीसीटीद्वारे टेकडीवर जिरविले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत ११ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याकरिता अनेकांनी कष्ट उपसून दोन वर्षे प्लॅस्टिकच्या डबक्यांनी पाणी दिले. या टेकडीवर हिरवळ फुलविण्याकरिता चाललेली धावपळ तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून हजारो लिटर वाया जाणारे अशुद्ध पाणी टेकडीवर वळवून जिरविण्याकरिता जलवाहिनी अंथरूण दिली. टेकडीवरील पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने लोकसहभागातून विद्युत पंप, ड्रिप व काटेरी कुंपणाची व्यवस्था करून हजारो वृक्षांचे संगोपन केले जात आहे.हल्ली या टेकडीवरील वृक्ष ४ ते ५ फुटांचे झाले असून अनेकांच्या घामाच्या थेंबांनी येथे हिरवळ पसरली आहे. त्यामुळे वर्ध्यातील नागरिक कुटुंबासह सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. कधीकाळी निर्मनुष्य असलेल्या टेकडीवर आता वर्धेकरांची गर्दी होऊ लागल्याने चोरट्यापासून व सरपटणाºया प्राण्यांपासून त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या फंडातून येथे तीन हायमास्ट लावण्यात आले. कालांतराने या परिसराचे ‘आॅक्सिजन पार्क’ असे नामकरण करण्यात आले. परंतु, आज शिक्षा मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या टेकडीवर आपला मालकी हक्क असल्याचे सांगून टेकडीवर कुंपण घातले आहे. सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करून तो या टेकडीवर जाण्यास मज्जाव करतात. त्यामुळे येथील वृक्षांच्या संगोपनाकरिता अडचणी निर्माण झाल्याने यावर तत्काळ उपाययोजना करावी; अन्यथा टेकडी वाचविण्याकरिता पर्यावरण व वृक्षप्रेमी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते अभिनव जनआंदोलन करतील, असा इशारा वैद्यकीय जनजागृती मंचने जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदनातून दिला. निवेदन देताना वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, डॉ. आनंद गाढवकर, प्रशांत वाडीभस्मे, अनंत बोबडे, अजय वरटकर, मंगेश दिवटे, महेश अडसुळे, अरविंद सरदार यांच्यासह पदाधिकारी व निसर्गप्रेमी उपस्थित होते.वनमंत्र्यांनी येथूनच केली घोषणातत्कालीन पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या आॅक्सिजन पार्कला भेट देत वृक्षारोपण केले होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून राज्यभरात नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत टेकड्यांवर असा उपक्र म राबविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह वर्ध्यातील अबालवृद्धांसह युवकांनी श्रमदान केले आहे. अशा स्थितीत या जागेवर आता मालकी हक्क दाखवून टेकडी हडपण्याचा केविलवाणा प्रकार कितपत योग्य? असा प्रश्न वर्धेकर उपस्थित करीत आहेत.हवे तर ‘बजाज आॅक्सिजन पार्क’ नाव द्यातीन वर्षांच्या अथक परिश्रमाअंती श्रमदानातून ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर वृक्ष डोलताना दिसत आहे. पण, शिक्षा मंडळाचे काही पदाधिकारी आता आडकाठी आणत आहेत. आम्हाला ही जागा नको, त्याला आमचे नावही नको, हवे तर या आॅक्सिजन पार्कला ‘बजाज आॅक्सिजन पार्क’ किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाव द्या, परंतु ही झाडे मोठी होईपर्यंत तीन ते चार वर्षे त्यांचे संगोपन करू द्या, अशी विनंती वारंवार करूनही शिक्षा मंडळाचे पदाधिकारी हेकेखोरपणा सोडत नसल्याचा आरोपही वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.