शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

वाहतूक पोलीस चौकीचे स्थानांतरण करा

By admin | Updated: March 14, 2016 02:14 IST

जाम चौरस्ता येथे वाहतूक पोलीस मदत चौकी आहे. याच ठिकाणी वाहन तपासणी केली जाते.

जाम ग्रा.पं.चे तहसीलदारांना साकडेसमुद्रपूर : जाम चौरस्ता येथे वाहतूक पोलीस मदत चौकी आहे. याच ठिकाणी वाहन तपासणी केली जाते. दरम्यान, गर्दी होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, सदर चौकी गावाबाहेर स्थापन करावी. वाहनांची तपासणीही तेथेच करण्यात यावी, अशी मागणी जाम ग्रामपंचायत व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत नायब तहसीलदार सुरेंद्र दांडेकर यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे. हैद्राबाद - नागपूर महामार्ग क्र. ७ वर वाहतूक नियंत्रण व अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने २० वर्षांपूर्वी गावाबाहेर नागपूर रोडवर वाहतूक पोलीस मदत चौकी उभारण्यात आली होती. आज त्या चौकीच्या सभोवताल मोठी गाववस्ती तयार झाली. बाजूलाच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळा आहे. सदर चौकीसमोर वाहन तपासणी सुरू असते. यावेळी कधी वाहने थांबत नाही वा वाहनाच्या समोर कठडे ओढले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोबत शाळेच्या मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे सदर चौकी गावाच्या बाहेर नेऊन वाहनाची तपासणी करावी, अशी मागणी जाम ग्रा.पं.चे उपसरपंचांनी चौकीतील अधिकाऱ्यांना केली होती; पण वरिष्ठांच्या आदेशानुसार दररोज किमान ४० केसेस करणे आवश्यक असल्याने त्यांनी ही मागणी अमान्य केली. यामुळे जाम ग्रा.पं. प्रशासन व बजरंग दलाने ही चौकी गावाबाहेर हटविण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. चौकी हटविण्यात आली नाही तर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी वर्धा, आमदार समीर कुणावार यांनाही पाठविण्यात आल्या. निवेदन देताना ग्रा.पं. उपसरपंच सचिन गावंडे, चांगदेव राऊत, बजरंग दलाचे सनी निवटे, साईनाथ भगत, प्रमोद चौखे, सुरेश उरकुडे, सागर निखाडे, अजय खेडेकर, पंकज लाटकर, अभिलाष गिरडकर, संजय कोरडे, विकास झाडे, सुरज कलोडे, चेतन हिवरकर, गणेश पोटे, कोळसे, मडावी यांच्यासह ग्रामस्थ, ग्रा.पं. सदस्य व बजरंग दल पदाधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधीे)