शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

दुर्लक्षी कारभारामुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: February 27, 2017 00:33 IST

शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

बजाज चौकातील प्रकार : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज; नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास वर्धा : शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. याच चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कामात कुचराई केल्या जात असल्याने या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रविवारी दुपारी येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. जवळपास १ तास परिश्रम केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी योग्य दखल घेण्याची गरज आहे. शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या व छोट्या-मोठ्या वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी शासनाचा मोठा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करू असे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले तरी हे काम कासव गतीनेच सुरू असल्याची ओरड आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून संबंधीतांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर कृती करणे क्रमप्राप्त होते. परंतु, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा प्रत्यय रविवारी दुपारी बघावयास मिळाला. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बजाज चौकात नेहमीप्रमानेच वाहतुकीची कोंडी झाली होती. परिणामी, यवतमाळकडून वर्धेत, हिंगणघाटकडून वर्धेत तर वर्धेतून हिंगणघाट व यवतमाळकडे जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बजाज चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यावर मार्ग काढण्याकरिता प्रशासनाच्यावतीने अरूंद असलेल्या उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी) मनमर्जीने केली जातात वाहने उभी स्थानिक बजाज चौकात पालिका प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असली या परिसरात ठिकठिकाणी मनमर्जीने वाहने उभी केली जात आहेत. बजाज चौकातील काही परिसरात आॅटो स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बरेच आॅटोचालक इतरांची पर्वा न करता आपल्या ताब्यातील वाहन रस्त्यावरच उभे करून आॅटोत प्रवासी बसवतात. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असून याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. कर्तव्यावरील अनेक वाहतूक पोलीस चहा व पानटपरीवरच अर्धा अधिक वेळ घालवताना दिसत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. बजाज चौकात मुख्य भाजी बाजार असून भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यातच रविवार असल्याने येथे होणारी गर्दी अधिक असते. सध्या बजाज चौकात वर्धा न. प. प्रशासनाने पे अ‍ॅन्ड पार्कची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचे येथे उभ्या असलेल्या वाहनांवरून दिसत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील बजाज चौक परिसरात आॅटोचालक व इतर वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. हा प्रकार मोठ्या अपघाता निमंत्रण देणारा ठरत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसह वाहनचालकांच्या या समस्येकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बजाज चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक आॅटोचालक व इतर वाहनचालक वाहतूक नियमांना येथे दररोज फाटाच देत असल्याचे बघावयास मिळते. त्यांच्या या अनागोंदी कारभाराकडे वाहतूक पोलिसही कानाडोळाच करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.