शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मोर्चामुळे उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प

By admin | Updated: March 11, 2016 02:38 IST

स्टेशन फैल परिसरातून आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

वर्धा : स्टेशन फैल परिसरातून आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बजाच चौक येथील उड्डाण पुलावर आला असता वाहतुकीचा खोळंबा झाला होता. येथून मोर्चा डॉ. आंबेडकर चौक येथे पोहोचला. न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ पोलिसांकडून त्यांना अडविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या निवेदनानुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत दिल्ली येथे १५ फेब्रुवारी रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले. त्यावर केंद्र शासनाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात देशातील २४ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल, त्यांना किमान वेतन लागू केले जाईल, अशी ग्वाही दिली होती; पण २९ फेब्रुवारी रोजी सादर अंदाजपत्रकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक पैशाचीही तरतूद केल्याचे दिसत नाही. ५ वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होत नसल्याने सेविका व मदतनिस, शासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढून विरोध दर्शवित असल्याचे सांगण्यात आले. सोबतच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कन्हैय्याकुमार हा बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा आहे. तो दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहे. या घटनेचा निषेधही नोंदविण्यात आला. मागण्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. हा निर्णय अंमलात येईपर्यंत त्रिपुरा शासनाने त्यांच्या राज्यात घेतलेल्या निर्णयानुसार वेतन देण्याची कारवाई करावी. वेतनाच्या मागणीचा निर्णय होईपर्यंत पार्लमेंटरी कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी. अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनात गत ४० वर्षांत ६ वेळा वाढ झाली. त्यांच्या मानधनात नियमीतपणे वाढ करणारी यंत्रणा तयार करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस पार्लमेंटरी कमेटीने केली आहे. महागाई भत्ता व वार्षिक वेतनवाढ द्यावी, अशी शिफारस कमेटीने केली. शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता मिळतो. या धर्तीवर महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व वार्षिक मानधन वाढ द्यावी, अशी मागणी आहे. शिवाय किमान वेतन कायद्याप्रमाणे एनआरएचएम मॅन्यूअल व पीआयपीमधील शिफारशीनुसार आशांना १७,२०० रुपये, गतप्रवर्तकांना २५ हजार रुपये वेतन द्यावे, शालेय पोषणातील कामगारांना किमान वेतन, यवतमाळ औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयावर अंमल करावा, शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना शासन, जि.प. सेवेत रिक्त पदावर सामावून घ्यावे आदी मागण्याही करण्यात आल्या.यावेळी राज्यसचिव दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, असलम पठाण, सुरेश गोसावी, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वर डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, यमुना नगराळे, बबिता चिमोटे, सुजाता भगत, संध्या म्हैसकार, प्रतिभा वाघमारे, वैशाली नंदरे, विणा पाटील, ज्योती वाघमारे, जयमाला बेलगे, रेखा नवले, गीता थूल यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहारतील कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.(प्रतिनिधी)