शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: April 6, 2016 02:15 IST

शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत.

रूंदीकरणाचा प्रश्न खितपत : मंजुरीनंतरही प्रक्रिया रखडल्याने कामकाजावर प्रश्नचिन्हवर्धा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत. परिणामी, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर एका वाहनात बिघाड आल्याने तब्बल तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला. या पुलाच्या रूंदीकरणाची प्रक्रिया अद्यापही पूढे न सरकल्याने दररोजच वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसते. शहरातून बाहेर जाणाऱ्या आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रथम काही वर्षे रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत पुलाचे रूंदीकरण रखडले होते. आता रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असताना पुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांची परवानगी गरजेची असते. यामुळे प्रथम राज्य शासनाकडे रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळविण्यात आली. यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्तावालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. राज्य शासनानेही पुलाच्या रूंदीकरणासाठी निधीची तरतूद केली; पण अद्यापही प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे आणि राज्य शासनाची मंजुरी मिळून निधीचा मार्ग मोकळा झाल्याने त्वरित हालचाली अपेक्षित होत्या; पण अद्याप कुठलीही पावले उचलली जात नसल्याचेच दिसते. काही महिन्यांपूर्वी रूंदीकरण कामासाठी मोजणी करण्यात आली होती; पण त्या पूढे प्रक्रिया सरकल्याचेच दिसत नाही. आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पूल अत्यंत अरूंद असल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. या पुलावरून हिंगणघाट, यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाण्याकरिता रस्ता आहे. या अरूंद पुलावर एखादे वाहन नादुरूस्त झाले तर तीनही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक वाहन पुलावर नादुरूस्त झाले. यामुळे बजाज चौकातील चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय यवतमाळ आणि हिंगणघाट मार्गावरही वाहनांचा रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना तब्बल एक तास कसरत करून वाहतूक सुरळीत करावी लागली. हा प्रकार नित्याचा झाल्याने रूंदीकरण गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)