शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: April 6, 2016 02:15 IST

शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत.

रूंदीकरणाचा प्रश्न खितपत : मंजुरीनंतरही प्रक्रिया रखडल्याने कामकाजावर प्रश्नचिन्हवर्धा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत. परिणामी, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर एका वाहनात बिघाड आल्याने तब्बल तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला. या पुलाच्या रूंदीकरणाची प्रक्रिया अद्यापही पूढे न सरकल्याने दररोजच वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसते. शहरातून बाहेर जाणाऱ्या आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रथम काही वर्षे रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत पुलाचे रूंदीकरण रखडले होते. आता रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असताना पुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांची परवानगी गरजेची असते. यामुळे प्रथम राज्य शासनाकडे रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळविण्यात आली. यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्तावालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. राज्य शासनानेही पुलाच्या रूंदीकरणासाठी निधीची तरतूद केली; पण अद्यापही प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे आणि राज्य शासनाची मंजुरी मिळून निधीचा मार्ग मोकळा झाल्याने त्वरित हालचाली अपेक्षित होत्या; पण अद्याप कुठलीही पावले उचलली जात नसल्याचेच दिसते. काही महिन्यांपूर्वी रूंदीकरण कामासाठी मोजणी करण्यात आली होती; पण त्या पूढे प्रक्रिया सरकल्याचेच दिसत नाही. आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पूल अत्यंत अरूंद असल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. या पुलावरून हिंगणघाट, यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाण्याकरिता रस्ता आहे. या अरूंद पुलावर एखादे वाहन नादुरूस्त झाले तर तीनही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक वाहन पुलावर नादुरूस्त झाले. यामुळे बजाज चौकातील चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय यवतमाळ आणि हिंगणघाट मार्गावरही वाहनांचा रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना तब्बल एक तास कसरत करून वाहतूक सुरळीत करावी लागली. हा प्रकार नित्याचा झाल्याने रूंदीकरण गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)