शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

रस्त्यांवरील मालवाहूंमुळे वाहतूक प्रभावित

By admin | Updated: March 17, 2016 02:45 IST

शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात.

नागरिक त्रस्त : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापवर्धा : शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. परिणामी चौकाचौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. मार्केट परिसरात कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहने ठेवताना नेहमीच अडचणी येतात. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांपुढे नेहमीच दुचाकी वाहनांची गर्दी असते. त्यातच लहान-लहान मालवाहू वाहने या दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी दिवस दिवस वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापला जातो. तसेच माल दुकानांमध्ये उतरविण्याचा प्रकार अनेक दुकानांमध्ये दिवस भर सुरू असतो. मंगळवारी सोशालिस्ट चौकात असलेल्या दुकानांसमोर दुपारी माल उतरवित असलेल्या वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे बराच वेळ येथे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नागरिक संताप व्यक्त करीत होते. दुकानांपुढे असलेल्या मोकळ्या जागेत ही वाहने उभी करून माल उतरविणे खरे तर गरजेचे आहे. पण अत्यल्प असलेल्या जागेतील अर्ध्या भागात आधीच दुकानांनी अतिक्रमण केले आहे. उरलेल्या जागेवर ग्राहकांची आणि दुकान मालकासह काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गाची वाहने उभी असतात. त्यामुळे मालवाहू वाहनांना रस्त्यावर वाहने उभी करूनच माल उतरवावा लागतो. एखाद्या दुकानापुढे मोकळी जागा असली तरीही वाहनचालक सोयीच्या दृष्टीने रस्त्यावरच गाडी उभी करतो. वाहतुकीवर काय परिणाम होत आहे याचा विचारच केला जात आहे. हा प्रकार शहरात नित्याचाच झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही समस्याही नवीन राहिलेली नसली तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. अश्या प्रकारे रस्त्यावर उभ्या मोठ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच दुकानदारांसोबत बोलून सकाळी लवकर माल उतरवून घेण्यासंबंधी त्यांना सुचविणे गरजेचे आहे. आपली वाहने कमी कमी रस्त्यावर येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण मालवाहू वाहनचालकांकडून याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. दुपारी मुख्य मार्गावर जास्त वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची शक्यता ही बळावली असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)