शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

ऐन हंगामात शेतांवर ‘टॉवर’ची तलवार

By admin | Updated: June 13, 2014 00:23 IST

औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य

वर्धा : औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे; पण यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे़ अल्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाईही दिली जात नाही़ यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे़

वीज वहनाकरिता सध्या सर्वत्र टॉवर उभारणीच्या कामांना वेग आल्याचे दिसते़ औरंगाबाद ते नागपूर या ७६५ केव्ही लाईनचे कामही नागपूरच्या एका कंपनीकडून केले जात आहे़ या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला दिला जात नसल्याचे समोर आले आहे़ याबाबत यापूर्वी शेतकऱ्यांमार्फत महासम्राट बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे पाटील व विदर्भ संपर्क प्रमुख अनिल नागरे यांनी माहिती गोळा केली होती़ यात अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली असल्याचे दिसून आले़ शिवाय शेतात टॉवरचे काम करताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याचे दिसून आले़ जड वाहनांच्या रहदारीमुळे जमिनही खराब होते़ यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे गरजेचे झाले आहे़

टॉवर लाईनच्या या कामाविरूद्ध न्यायालयात दाद मागितली जाणार असून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची बाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, जालना येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधीक्षक या सर्वांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत योग्य व स्पष्ट करार झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे़

संघर्ष व वाद निर्माण होऊ नये म्हणून सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट सूचना द्याव्यात़ यात ज्या शेतकऱ्याच्या शेतात टॉवरचे काम होणार असेल, त्याला टॉवर उभारण्यापूर्वी किती रक्कम देणार, त्या रकमेचा ‘पोस्ट डेटेड’ चेक देण्यात यावा, अशा सूचना देण्याची विनंती महासम्राट बळीराजा संघटनेमार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, उर्जामंत्री व सचिव उर्जा विभाग यांना देण्यात आले आहे़ टॉवरचे काम व होणारे नुकसान याचा अंदाज घेतल्यास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यास १० लाख रुपये मिळायला हवे, अशी मागणी केली आहे़ ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, याची कल्पना सर्व मंत्र्यांना देण्यात आली आहे़ शरद पवार यांनाही कुरीयरमार्फत निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे़ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची बारामती येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून योग्य नुकसान भरपाई देण्यात यासवी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)