शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात शेतांवर ‘टॉवर’ची तलवार

By admin | Updated: June 13, 2014 00:23 IST

औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य

वर्धा : औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे; पण यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे़ अल्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाईही दिली जात नाही़ यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे़

वीज वहनाकरिता सध्या सर्वत्र टॉवर उभारणीच्या कामांना वेग आल्याचे दिसते़ औरंगाबाद ते नागपूर या ७६५ केव्ही लाईनचे कामही नागपूरच्या एका कंपनीकडून केले जात आहे़ या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला दिला जात नसल्याचे समोर आले आहे़ याबाबत यापूर्वी शेतकऱ्यांमार्फत महासम्राट बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे पाटील व विदर्भ संपर्क प्रमुख अनिल नागरे यांनी माहिती गोळा केली होती़ यात अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली असल्याचे दिसून आले़ शिवाय शेतात टॉवरचे काम करताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याचे दिसून आले़ जड वाहनांच्या रहदारीमुळे जमिनही खराब होते़ यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे गरजेचे झाले आहे़

टॉवर लाईनच्या या कामाविरूद्ध न्यायालयात दाद मागितली जाणार असून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची बाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, जालना येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधीक्षक या सर्वांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत योग्य व स्पष्ट करार झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे़

संघर्ष व वाद निर्माण होऊ नये म्हणून सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट सूचना द्याव्यात़ यात ज्या शेतकऱ्याच्या शेतात टॉवरचे काम होणार असेल, त्याला टॉवर उभारण्यापूर्वी किती रक्कम देणार, त्या रकमेचा ‘पोस्ट डेटेड’ चेक देण्यात यावा, अशा सूचना देण्याची विनंती महासम्राट बळीराजा संघटनेमार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, उर्जामंत्री व सचिव उर्जा विभाग यांना देण्यात आले आहे़ टॉवरचे काम व होणारे नुकसान याचा अंदाज घेतल्यास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यास १० लाख रुपये मिळायला हवे, अशी मागणी केली आहे़ ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, याची कल्पना सर्व मंत्र्यांना देण्यात आली आहे़ शरद पवार यांनाही कुरीयरमार्फत निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे़ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची बारामती येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून योग्य नुकसान भरपाई देण्यात यासवी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)