शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

वाहनधारकांची खड्ड्यांशी झुंज

By admin | Updated: November 29, 2014 23:26 IST

येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना

वायगाव(नि.) : येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना उपस्थित होतो. या मार्गाची पूर्णता वाट लागली असून रस्त्यावरील खड्डे प्रवाशाच्या जीवावर उठत आहे. ‘नजर चुकताच खड्डड्यात घुसा आणि अपघात ग्रस्त व्हा’ असाच प्रकार या मार्गावरील खड्ड्यामुळे सध्या सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या खड्ड्यांशी झुंज सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. वायगाव(नि.) ते देवळी हे अंतर १२ किलो मीटरचे आहे. याच मार्गाने आजगाव, सिरसगाव हा मार्ग वडद जावे लागते. चंद्रपूर, हिंगणघाट ते पुलगाव, अमरावती जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या संख्येने वाहने धावतात. त्यात खाजगी बस, ट्रक आणि अन्य वाहनांचाही समावेश असतो. हा मार्ग मुख्य मार्ग असल्याने तो सुव्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे. या मार्गाने प्रवास करताना विदारक अनुभव येतो. वडद ते देवळी दरम्यान तर फुटभर अंतरावर खड्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता आहे हेच कळायला प्रवाशांना मार्ग नसतो. नजर चुकताच वाहन चालकांचा सामना हा खड्ड्यांसोबत होतो. थोडेही लक्ष विचलित होणे वाहन चालकासाठी जीव घणे किंवा दुखापतीस कारणीभूत ठरू शकते. काही भागात तर खड्याची खोली फुटभर असल्याचे दिसून येत आहे. जागोजागी असलेल्या खड्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गाकडे बाधंकाम विभागाचे अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना या मार्गाच्या दुरवस्थेचा अंदाज नसावा असे बोलले जात आहे. या मार्गावर रोज प्रवाशांना खड्ड्यांमुळे मृत्यूलाच आमंत्रण देत प्रवास करावा लागतो. रस्ता दुरुस्तीची मागणी ही वेळोवेळी होते. मात्र त्याकडे बाधंकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वाहन चालकांना वाहणे चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असून काही भागात रस्ता म्हणजे पांदण रस्ता असल्याचा प्रत्यय येतो. या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना अनेकांना मनक्याचे तसेच सांधेदुखीचे आजारही बळावू लागल्याचे सांगितले जाते. या मार्गावर किरकोळ अपघात तर आता नित्याचेच झाले आहे. मात्र मोठा अपघात घडल्यानंतरच बाधंकाम विभागाला जाग येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा मार्गे वायगावकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या कंपन्यांमधून अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून दुरुस्तीची मागणी आहे.(वार्ताहर)