शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

महिनाभरात प्रवासात बंद पडल्या ६० बसगाड्या

By admin | Updated: May 23, 2014 00:06 IST

रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्‍या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे.

रूपेश खैरी - वर्धा

रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्‍या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे. प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याची सरासरी काढल्यास रोज दोन बसगाड्या बंद पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. सुरक्षित प्रवासाकरिता परिवहन विभाग, असे म्हटल्या जाते; मात्र परिवहन विभागाच्या बसगाड्या भंगार झाल्याने हे ब्रीद आता खोटे ठरू लागले आहे. प्रवासी घेवून निघालेली परिवहन विभागाची बसगाडी ठरलेल्या वेळी ठरलेले अंतर कापून नियोजित गावी पोहोचेल याचा कुठलाही नेम राहिला नाही. परिवहन विभाच्या बसगाड्या रस्त्याने बंद पडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करीत पायदळ गाव गाठावे लागत आहे. रस्त्याने प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याचा फटका परिवहन विभागालाही बसला आहे. याच कारणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात परिवहन विभागाच्या बसगाड्यांचा होणारा प्रासंगिक करार कमी होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन विभागाचा कारभार सुरू आहे. या पाचही आगारातील गाड्यांची दैना झाल्याने त्याचा त्रास बसगाड्यांतून प्रवास करणार्‍यांना अधिक बसत आहे. बसच्या कोणत्या खिडकीला काच नाही, आसन व्यवस्था नाही, बसचे बरेच भाग पडलेले असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. याचा फटका परिवहन विभागाला बसला असून वर्धा आगाराच्या अनेक बसगाड्यांना उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालान देण्यात आले आहेत. गाड्या चालान करण्याच्या प्रकरणात विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात एका अधिकार्‍याला निलंबितही व्हावे लागले. असे असले तरी यातून विभागाच्या अधिकार्‍यांनी या अधिकार्‍याच्या पाठीशी राहून त्याचे निलंबन रद्द केले. विभागाच्या पाठीशी एवढा अनुभव असतानाही वर्धा परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांकडून यातून कुठलाही धडा घेतला नाही. बसगाड्या रस्त्याने बंद पडण्याचा प्रकार सुरूच आहे. हा प्रकार वर्धा विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती असून या भंगार बसगाड्या अजूनही रस्त्यावर धावतच आहेत.