शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

उद्या ‘ते’ गांधींनाही देशद्रोही ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:19 IST

सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : भा.ल. भोळे पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या बाता करणारी मंडळी उद्या महात्मा गांधींनाही देशद्रोही ठरविण्यास कमी करणार नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे आयोजित डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार वितरण समारोहात ते बोलत होते.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहात डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांना ‘मूल्यभानाची सामग्री’ या ग्रंथाकरिता डॉ. भा.ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार प्रदान केला. ‘आंदोलन’ मासिकाच्या संपादक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सुलभा रघुनाथ, पुणे यांना डॉ. भा.ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर औरंगाबाद येथील प्रा. राहुल कोसंबी यांना डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. जोशी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विचारपीठावर पुरस्कार समितीचे संयोजक किशोर बेडकीहाळ, विजया भोळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, सहसचिव प्रा. राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.सध्याचा काळ हा सांस्कृतिक उदात्तीकरण करण्याचा आहे. त्यातून संस्कृतीच्या पोटात काय दडले आहे, हे कळत नाही. संस्कृती ही बाजारात मिळण्याइतपत सुमार गोष्ट झाली आहे, असे मनोगत डॉ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. जात, धर्म, लिंग यावर नवा फॅसिझम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे, अशी भूमिका सुनीती सु.र यांनी मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. पुरस्कृत व्यक्तींच्या निवडीमागील निकष व परिचय किशोर बेडकिहाळ व चैत्रा रेडकर यांनी करुन दिला. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. सन्मानपत्रांचे वाचन डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते व संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. कार्यक्रमाला अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. विलास देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके, अनिल नितनवरे, हिरण्मय भोळे, डॉ. विलास देशमुख, डॉ. तारक काटे, देवराव कासटवार, गुणवंत डकरे, डॉ. गजानन कोटेवार, अभ्युदय मेघे, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा.प्रल्हाद इंगळे, प्रा. येऊलकर, डॉ. वंदना फरसोले, महेश मोकलकर आदी उपस्थित होते.