शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ‘ते’ गांधींनाही देशद्रोही ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:19 IST

सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : भा.ल. भोळे पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या बाता करणारी मंडळी उद्या महात्मा गांधींनाही देशद्रोही ठरविण्यास कमी करणार नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे आयोजित डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार वितरण समारोहात ते बोलत होते.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहात डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांना ‘मूल्यभानाची सामग्री’ या ग्रंथाकरिता डॉ. भा.ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार प्रदान केला. ‘आंदोलन’ मासिकाच्या संपादक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सुलभा रघुनाथ, पुणे यांना डॉ. भा.ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर औरंगाबाद येथील प्रा. राहुल कोसंबी यांना डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. जोशी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विचारपीठावर पुरस्कार समितीचे संयोजक किशोर बेडकीहाळ, विजया भोळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, सहसचिव प्रा. राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.सध्याचा काळ हा सांस्कृतिक उदात्तीकरण करण्याचा आहे. त्यातून संस्कृतीच्या पोटात काय दडले आहे, हे कळत नाही. संस्कृती ही बाजारात मिळण्याइतपत सुमार गोष्ट झाली आहे, असे मनोगत डॉ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. जात, धर्म, लिंग यावर नवा फॅसिझम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे, अशी भूमिका सुनीती सु.र यांनी मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. पुरस्कृत व्यक्तींच्या निवडीमागील निकष व परिचय किशोर बेडकिहाळ व चैत्रा रेडकर यांनी करुन दिला. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. सन्मानपत्रांचे वाचन डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते व संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. कार्यक्रमाला अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. विलास देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके, अनिल नितनवरे, हिरण्मय भोळे, डॉ. विलास देशमुख, डॉ. तारक काटे, देवराव कासटवार, गुणवंत डकरे, डॉ. गजानन कोटेवार, अभ्युदय मेघे, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा.प्रल्हाद इंगळे, प्रा. येऊलकर, डॉ. वंदना फरसोले, महेश मोकलकर आदी उपस्थित होते.