शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

आजचा विद्यार्थीच उद्याचे प्रगत राष्ट्र निर्माण करेल

By admin | Updated: February 27, 2016 02:24 IST

विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करुन भारताने यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान जगभरात पोहचते आहे.

मोहन खेडकर : ‘व्हिलस्पिन’ या राष्ट्रीय तंत्रज्ञान कार्यशाळेला प्रारंभवर्धा : विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करुन भारताने यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान जगभरात पोहचते आहे. एवढी उत्तुंग झेप अद्यावत तंत्रज्ञानाने घेतली आहे. व्हिलस्पिनचे हे चक्र अद्ययावत ज्ञानाला गतीमान करणारे सशक्त माध्यम असून विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल. या ऊर्जेतूनच सशक्त भारताची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले. सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीयस्तरीय टेकफेस्ट व्हिलस्पिनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे संयोजक डॉ. एम.डी. चौधरी, कॉम्प्युटर विद्याशाखेचे संयोजक प्रा. सुधीर मोहोड, व्हिलस्पिन समन्वयक डॉ. आर.एस. मंगळुरकर, संयोजक प्रा. ए.एन. ठाकरे, विद्यार्थी संयोजक दिपंकर रॉय उपस्थित होते. डॉ. खेडकर म्हणाले, सराव हा आत्मविश्वासाचा पाया आहे. माहिती नसलेली एखादी गोष्ट आपण केली तर अपयश येईल ही नकारात्मक भावना आपल्याला नेहमी मागे खेचत असते. म्हणून प्रयत्नात सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा. मला नक्कीच जमेल ही विचारधाराच आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढविते. व्हिलस्पिनची संकल्पना उलगडतांना ते म्हणाले की, रेल्वेचे सर्व चाक ही व्यवस्थित चालतात म्हणून ती निर्धारित स्थळी व्यवस्थित पोहचते. व्हिलचे स्पिनिंग योग्य असते म्हणून कुठलाही धोका संभवत नाही. यातील एक चाक जरी डगमगले तरी अपघात होतो. ज्ञानाच हे चक्र तुम्ही असेच संतुलित चालविल्यास नवनवीन ज्ञानाची उत्पती होईल. आपण यशही काबीज करू ते सहकार्यानेच. जगन्नाथ रथयात्रेचे त्यांनी यावेळी उदाहरण दिले. यानंतर डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाने हे व्हिलस्पिन यशस्वी होत असून व्हिलस्पिन विद्यार्थ्यांना संशोधनाची दृष्टी, प्रोत्साहन देते असे सांगितले. येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास विद्यार्थी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात व्हिलस्पिनच्या चित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मंगळुरकर यांनी दिवसभर चालणाऱ्या टेकफेस्टबद्दल माहिती दिली. व्हिलस्पिनचे अनावरण पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले असून व्हिलस्पिन अंतर्गत एकूण २४ विविध उपक्रम आयोजित असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ज्ञानाच्या कक्षा रूदांवणार भक्कम व्यासपीठ म्हणजे व्हिलस्पिन असल्याचेही डॉ. मंगळुरकर म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन विराज भोयर व वैदही देशमुख यांनी केले. आभार प्रा. ए.एन. ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)