शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

आजपासून बारावीचा महासंग्राम; विद्यार्थी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:17 IST

आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्दे५१ केंद्र : १८ हजार ३६१ विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपीबहाद्दरांना मिळणार चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.विज्ञान, कला व एमसीव्हीसीच्या १८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे. आता हे सर्व विद्यार्थी या महासंग्रामाला सामोरे जात आहेत.बारावीच्या परीक्षेकरिता अकरावीत प्रवेश घेतल्यापासूनच पालकांसह विद्यार्थीही तयारीला लागतात. महाविद्यालय त्यानंतर शिकवणी वर्ग यातून वेळ काढून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत होते. विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यायात प्रवेश नोंदवून दोन्ही वर्षे शिकवणीवर्गातच अभ्यास केला. प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षेकरिताच त्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे विज्ञान शाखेला सक्तीची केलेली बायोमेट्रिक हजेरीही केवळ औपचारिकताच ठरली. अखेर बारावीच्या परीक्षेचा दिवस आला असून २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. दोन वर्षात केलेल्या अभ्यासाची परीक्षा तीन तासातच होणार असल्याने विद्यार्थीही जोमाने कामाला लागले आहे. आता यात कोण बाजी मारेल हे निकालावरून कळेल. परीक्षेच्या आदल्यादिवशी शुभेच्छांची आदान-प्रदान सुरू होती.सहा भरारी पथकांचा राहणार वॉचबारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक जिल्ह्यातील ५१ परीक्षा केंद्रावर वॉच ठेवणार आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर यांच्यासह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे विशेष भरारी पथक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचे पथक व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाचा समावेश आहे.परीक्षा केंद्राचे होणार चित्रीकरणदहावी व बारावीच्या परीक्षेत यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या उद्देशाने प्रथमच शिक्षण विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरुन चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता परीक्षा केंद्राचीही जबाबदारी वाढली असून कॉपी बहाद्दरांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.शिक्षण मंडळाकडून हेल्पलाईनदहावी व बारावी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याना काही बाबींची माहिती अवगत व्हावी, यासाठी शिक्षण मंडळाने हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. २० फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळेल. ही हेल्पलाईन सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

टॅग्स :examपरीक्षा