शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आजपासून बारावीचा महासंग्राम; विद्यार्थी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:17 IST

आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्दे५१ केंद्र : १८ हजार ३६१ विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपीबहाद्दरांना मिळणार चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.विज्ञान, कला व एमसीव्हीसीच्या १८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे. आता हे सर्व विद्यार्थी या महासंग्रामाला सामोरे जात आहेत.बारावीच्या परीक्षेकरिता अकरावीत प्रवेश घेतल्यापासूनच पालकांसह विद्यार्थीही तयारीला लागतात. महाविद्यालय त्यानंतर शिकवणी वर्ग यातून वेळ काढून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत होते. विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यायात प्रवेश नोंदवून दोन्ही वर्षे शिकवणीवर्गातच अभ्यास केला. प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षेकरिताच त्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे विज्ञान शाखेला सक्तीची केलेली बायोमेट्रिक हजेरीही केवळ औपचारिकताच ठरली. अखेर बारावीच्या परीक्षेचा दिवस आला असून २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. दोन वर्षात केलेल्या अभ्यासाची परीक्षा तीन तासातच होणार असल्याने विद्यार्थीही जोमाने कामाला लागले आहे. आता यात कोण बाजी मारेल हे निकालावरून कळेल. परीक्षेच्या आदल्यादिवशी शुभेच्छांची आदान-प्रदान सुरू होती.सहा भरारी पथकांचा राहणार वॉचबारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक जिल्ह्यातील ५१ परीक्षा केंद्रावर वॉच ठेवणार आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर यांच्यासह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे विशेष भरारी पथक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचे पथक व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाचा समावेश आहे.परीक्षा केंद्राचे होणार चित्रीकरणदहावी व बारावीच्या परीक्षेत यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या उद्देशाने प्रथमच शिक्षण विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरुन चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता परीक्षा केंद्राचीही जबाबदारी वाढली असून कॉपी बहाद्दरांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.शिक्षण मंडळाकडून हेल्पलाईनदहावी व बारावी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याना काही बाबींची माहिती अवगत व्हावी, यासाठी शिक्षण मंडळाने हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. २० फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळेल. ही हेल्पलाईन सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

टॅग्स :examपरीक्षा