शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अवकाळीचा ४ हजार ७६८ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआर्वी, वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसान : २९४ गावे बाधित, प्रशासनाचा प्राथमिक अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रबी हंगामातील पिके मळणीच्या टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने शेतशिवार झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या २९३ गावातील ४ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये मंळवारच्या रात्री मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. काही परिसरात गारपीटही झाली. यामुळे वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या आठही तालुक्यात कमीअधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. या अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.आठही तालुक्यातील २९३ बाधित गावातील ६८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील सर्वाधिक ३० घरांची नोंद आहे. आर्वी तालुक्यात १४, देवळीत १३, हिंगणघाटात सात तर सेलू तीन घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे आर्वी आणि आष्टी तालुक्यातील प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.दोघे जखमी, जनावरेही दगावलीवादळी पावसासह कारंजा तालुक्यात वीज पडल्यामुळे सावल येथे एक तर खैरवाडा येथे तीन असे चार शेतकरी जखमी झाले आहे. एकावर कारंजा तर तिघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासनाकडे केवळ दोन व्यक्तींची माहिती आल्याने प्राथमिक अहवालात दोन व्यक्तींचाच समावेश करण्यात आला आहे. तसेच सेलू व आष्टी तालुक्यात प्रत्येकी एक जनावर दगावले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती