शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

नाकर्त्या प्रशासनामुळे शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ

By admin | Updated: May 14, 2015 02:00 IST

महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम, नियोजन शून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना बसत आहे़

तिसरा दिवस : सरपंचही आंदोलनात सहभागी; प्रशासनाची डोळेझाकआष्टी (श़) : महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम, नियोजन शून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना बसत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळेच सध्या अंतोरा येथील शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे़ तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच असून अधिकाऱ्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही़ यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ महाराष्ट्र शासनाने सिंचन विहिरींची सोय शेतकऱ्यांना करून दिली; पण महावितरणचे अभियंते हलगर्जी करीत असल्याने अद्याप काही शेतकऱ्यांना वीज जोडणीच देण्यात आलेली नाही़ परिणामी, उन्हाळी पिके विहिरीत पाणी असताना शेतकऱ्यांच्या हातून गेली. ओलिताची सोय असूनही कित्येक शेतकऱ्यांना पिके नष्ट होत असलेली उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे़ यासह अनेक समस्या अंतोरा सर्कलमध्ये शेतकरी व नागरिकांना भेडसावत आहेत. कनिष्ठ अभियंता वरिष्ठ व पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने सदर शेतकरी व लहानआर्वीचे सरपंच सुनील साबळे यांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला़ महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्धा नदीतील रेतीघाटातून मिळकत असल्याने ते शेतकरी व लाभार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात़ यामुळे संजय निराधार सारख्या योजनांतील तक्रारी वाढल्याचे दिसते़(प्रतिनिधी)अंतोरा येथील सात तरूण शेतकरी सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत; पण येथील तहसीलदार हिरणवाड यांनी उपोषणकर्त्यांची दखल न घेता अधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागते, ही एक कला आहे, असा कानमंत्र उपोषणकर्त्यांना दिला. शेतकऱ्यांची कामे तातडीने सोडविल्यास अशी वेळ शेतकऱ्यांवर येत नाही व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे सोडून त्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.- राजेश ठाकरे, अंतोरा़