शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:35 IST

एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देतूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण : उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.तालुक्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्यावर्षी तूर पिकाची लागवड केली. तशी नोंदही तालुका कृषी विभागाने घेतली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची उंचीही बºयापैकी वाढली. सध्या तूर पीक फुलावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक झाडच वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळेच व वातावरणातील बदलामुळेच तूर पीक करपत असल्याचे काही शेतकरी सांगतात. परंतु, वास्तविकता काय आहे याची पाहणी करून तूर उत्पादक शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आर्वी तालुक्यातील वाढोडा, वागदा, अहिरवाडा, देऊरवाडा, नांदपूर, सर्कसपूर, माटोडा, एकलारा, लाडेगाव, टाकरखेड, जळगाव, निंबोली (शेंडे), टोणा, वर्धमनेरी, रोहणा, सालफळ, सायखेडा, दिघी, वडगाव (पांडे), चांदणी, गुमगाव, चिंचोली (डांगे), पिंपळखुटा, दहेगाव, पाचेगाव, बाजारवाडा, हैबतपूर, पिपरी, टोणा आदी शेत शिवारांमधील तूर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे तेथील तूर उत्पादकांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढली आहे. इतकेच नव्हे तर आपण यंदा चार एकरात तुरीची लागवड केली. परंतु, अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हे पीक वाळत आहे. उपाययोजनांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.- भास्कर चौकोणे,शेतकरी, दहेगाव (मु.).अत्यल्प पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम तूर पिकावर होत आहे. शेतकºयांनी सायंकाळच्या वेळी तूर पिकाच्या काठावर शेकोटी पेटवावी. १० डिग्रीपेक्षा कमीचे तापमान तूर पिकाला मानवत नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती