शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:35 IST

एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देतूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण : उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.तालुक्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्यावर्षी तूर पिकाची लागवड केली. तशी नोंदही तालुका कृषी विभागाने घेतली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची उंचीही बºयापैकी वाढली. सध्या तूर पीक फुलावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक झाडच वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळेच व वातावरणातील बदलामुळेच तूर पीक करपत असल्याचे काही शेतकरी सांगतात. परंतु, वास्तविकता काय आहे याची पाहणी करून तूर उत्पादक शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आर्वी तालुक्यातील वाढोडा, वागदा, अहिरवाडा, देऊरवाडा, नांदपूर, सर्कसपूर, माटोडा, एकलारा, लाडेगाव, टाकरखेड, जळगाव, निंबोली (शेंडे), टोणा, वर्धमनेरी, रोहणा, सालफळ, सायखेडा, दिघी, वडगाव (पांडे), चांदणी, गुमगाव, चिंचोली (डांगे), पिंपळखुटा, दहेगाव, पाचेगाव, बाजारवाडा, हैबतपूर, पिपरी, टोणा आदी शेत शिवारांमधील तूर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे तेथील तूर उत्पादकांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढली आहे. इतकेच नव्हे तर आपण यंदा चार एकरात तुरीची लागवड केली. परंतु, अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हे पीक वाळत आहे. उपाययोजनांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.- भास्कर चौकोणे,शेतकरी, दहेगाव (मु.).अत्यल्प पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम तूर पिकावर होत आहे. शेतकºयांनी सायंकाळच्या वेळी तूर पिकाच्या काठावर शेकोटी पेटवावी. १० डिग्रीपेक्षा कमीचे तापमान तूर पिकाला मानवत नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती