शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:35 IST

एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देतूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण : उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.तालुक्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्यावर्षी तूर पिकाची लागवड केली. तशी नोंदही तालुका कृषी विभागाने घेतली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची उंचीही बºयापैकी वाढली. सध्या तूर पीक फुलावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक झाडच वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळेच व वातावरणातील बदलामुळेच तूर पीक करपत असल्याचे काही शेतकरी सांगतात. परंतु, वास्तविकता काय आहे याची पाहणी करून तूर उत्पादक शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आर्वी तालुक्यातील वाढोडा, वागदा, अहिरवाडा, देऊरवाडा, नांदपूर, सर्कसपूर, माटोडा, एकलारा, लाडेगाव, टाकरखेड, जळगाव, निंबोली (शेंडे), टोणा, वर्धमनेरी, रोहणा, सालफळ, सायखेडा, दिघी, वडगाव (पांडे), चांदणी, गुमगाव, चिंचोली (डांगे), पिंपळखुटा, दहेगाव, पाचेगाव, बाजारवाडा, हैबतपूर, पिपरी, टोणा आदी शेत शिवारांमधील तूर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे तेथील तूर उत्पादकांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढली आहे. इतकेच नव्हे तर आपण यंदा चार एकरात तुरीची लागवड केली. परंतु, अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हे पीक वाळत आहे. उपाययोजनांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.- भास्कर चौकोणे,शेतकरी, दहेगाव (मु.).अत्यल्प पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम तूर पिकावर होत आहे. शेतकºयांनी सायंकाळच्या वेळी तूर पिकाच्या काठावर शेकोटी पेटवावी. १० डिग्रीपेक्षा कमीचे तापमान तूर पिकाला मानवत नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती