शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

पाच दिवसांपासून वाघांचा शेतात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:34 IST

खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : वनविभाग फोडताहेत केवळ फटाके

आॅनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे. वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जात नसल्याने कामे प्रभावित झाली आहेत. वनविभागाच्या कर्मचाºयांनी फटाके फोडले की वाघाची जोडी जंगलात जाते व परत त्याच ठिकाणी येत आहे.प्रारंभी वनविभागाने ही वाघिण बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरिना असल्याचे सांगितले होते; पण आता मात्र ग्रामस्थ व वनविभागाच्या पाहणीत येथे वाघाची जोडी आढळून आली. यामुळे नेमके कोणते वाघ व वाघिण आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. सदर जंगलात कॅटरिना, बाजीराव, टिंकी, युवराज, कॅटरिनाचे २ वर्षीय तीन बछडे व अन्य वाघाचे वास्तव्य आहे. गत पाच दिवसांपासून सुरेश कोरचे व जनार्दन कोरचे यांच्या शेतात नर-मादिचे वास्तव्य आहे. ग्रामस्थांनी ही बाब वन विभागाला कळविल्यानंतर दररोज वनपथक येवून फटाके फोडतात. त्यामुळे नर-मादीची ही जोडी जंगलात आश्रयाला जातात व फटाक्याचे आवाज बंद झाले की परत शेतात येतात.याबाबत क्षेत्र सहाय्यक दिनकर पाटील म्हणाले की, हा त्यांचा बहुतेक मिलनाचा प्रयत्न असावा, त्यामुळे ते जोडीने थांबले असावे. शिवारातील सुरेश कोरचे, जनार्दन कोरचे, बंडु आडे, तुळसीराम नागोसे, मारोतराव निकोडे, पांडुरंग ठाकरे, निखील काकडे या शेतकºयांनी वाघाच्या दहशतीने शेतात जाणे बंद केले. वेचणीला आलेला कापूस वेचणी करता आला नाही. तुरीचे पीक काढणीला आले आहे. सवंगणी खोळंबली आहे. याशिवाय चना, गहू या रबी पिकांना ओलित करता येत नसल्याने पीक हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायम संकटाशी झुंज देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट घोंगावत आहे. वाघ नर-मादीची जोडी पुन्हा किती दिवस येथे ठिय्या मांडणार याबाबत कुणीही सांगत नसल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.शेतकऱ्यांवर नवे संकटपेरणीच्या हंगामात नरभक्षी वाघिणीच्या दहशतीच्या सावरात सापडलेले शेतकरी तिच्या दहशतीतून सावरत नाही तो नवे संकट उभे टाकले आहे. वाघांच्या वास्तव्यामुळे शेतीकामाचा विचका झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या विचाराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ही जोडी नेमकी कोणत्या नर-मादीची आहे. याबाबत वनविभागात संभ्रम आहे.