शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

तूर खरेदीच्या मुदतवाढीने संभ्रमावस्था

By admin | Updated: May 10, 2017 00:40 IST

तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत वाढविली आहे.

स्पष्ट निर्देश नाही : कूपन असलेली ६,२५६ क्विंटल तूर अद्यापही कृउबासच्या यार्डवर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत वाढविली आहे. ही मुदत वाढविताना त्यांच्याकडून कुपन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल अथवा नवे केंद्र सुरू करून तूर खरेदी होईल या संदर्भात कुठल्याही स्पष्ट सूचना नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यातही शेतकऱ्यांकडून प्रारंभी केवळ १ लाख क्विंटल तूर खरेदीचे संकेत दिल्याने पुढे ‘येरे माझ्या मागल्या’च होणार असल्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सुमारे दीड हजार रुपये नुकसान सहन करून व्यापाऱ्यांना तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यात शासनाने ज्या शेतकऱ्यांना कुपन दिले त्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा केली होती. यात राज्य शासनाच्या विदर्भ मार्केटींग फेडरेशन आणि महाराष्ट्र मार्केटींग फेडेशनच्यावतीने तूर खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. शासकीय खरेदी बंद झाली त्यावेळी सहा केंद्रांवरून १३ हजार ८८१ क्विंटल तुरीचे कुपन देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ७ हजार ५०७ क्विंटल तूर खरेदी झाली असून ६,२२८ क्ंिवटल तूर बाजारात आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात यंदा झालेल्या उत्पादनावरून सुमोर दीड लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. केंद्राने तूर खरेदीला मुदतवाढ दिल्याने या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु या संदर्भात उपनिबंधक कार्यालयात स्पष्ट निर्देश आले नसल्याने नवे केंद्र उघडण्यात येणार आहे अथवा बाजार समितीच्या यार्डात असलेलीच तूर नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ६,८८८ शेतकऱ्यांकडून १.४२ लाख क्विंटलची खरेदी बाजारात तुरीची खरेदी सुरू होताच दर कोसळल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची तूर नाफेड आणि एफसीआय खरेदी करेल असे जाहीर केले होते. यानुसार जिल्ह्यात काही केंद्र सुरू झाले. या केंद्रांवरून ६, ८८८ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार ९८४ क्विंटल तुरीची खरेदी झाली. यात नाफेडने हात वर केल्याने आता व्हीसीएमएफ व एमसीएमएफच्यावतीने खरेदी सुरू झाली आहे. कुपन दिलेल्या शेतकऱ्यांकडून या दोन्ही संस्था तूर खरेदी करीत आहे. आता केंद्राने तूर खरेदीला मुदवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीत नाफेडकडून तूर खरेदी होणार आहे. आता ही संस्था कुपन दिलेल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करेल की नव्याने केंद्र सुरू करेल या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीची मुदतवाढ दिल्याचे समजते; मात्र तसे परिपत्रक आले नाही. वाढलेल्या मुदतीत पहिले कूपन देवून असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल किंवा नव्याने केंद्र सुरू करून शेतकऱ्यांकडून तूर खरेदी होईल या संदर्भात कुठल्याही स्पष्ट सूचना दिल्या नाही. यामुळे खरेदी संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. - जयंत तलमले, सहायक उपनिबंधक वर्धा जिल्ह्यात शासनापेक्षा व्यापाऱ्यांचीच खरेदी अधिक जिल्ह्यात नाफेडच्यावतीने तूर खरेदी झाली. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू कमी आणि बंदच अधिक राहिल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात व्यापाऱ्यांचीच खरेदी अधिक झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून १ लाख ८८ हजार ५३८ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. शासनाकडून योग्य निर्देष नसल्याने व्यापाऱ्यांची तूर खरेदी आणखी वाढणार असल्याचे संकेत दिसत आहे.