शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन शक्य

By admin | Updated: June 26, 2014 23:28 IST

शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे

वर्धा : शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दलित मित्र एम.एन कासारे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कासारे बोलत होते. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जिल्हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत उपस्थित होत्या. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून छत्रपती शाहू महराजांनी विविध योजनांची आखणी केल्याचे सांगताना एम.एन.कासारे म्हणाले, समाजातील जातीभेद नष्ट करून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. आणि सामाजिक न्याय मिळवून दिला. समाजाचे प्रश्न सोडविताना विकासाची समान संधी दिली. त्यामुळेच सामाजिक व आर्थिक विकास शक्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना वंचितापर्यंत पोहचवून त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा. अपंग अथवा महिलांना समान संधी मिळावी त्यांना त्याचे हक्क मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. गोपाल कालेकर यांनीही सामाजिक न्याय हा सर्वांना समान असावा आणि समाजातील वंचितांचे प्रश्न सुटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सामाजिक न्याय दिनाचे दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. तसेच छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.यावेळी शालांत परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबद्दल गर्ल्स हायस्कूल आंजी येथील प्रगती विजय झपाटे, समीक्षा दीपक भगत, अमर दिनकर कोयरे, शिवानी सुधाकर गायकवाड, तसेच बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी मोनिका घडे, गजानन नेहरे, प्रणाली कांबळे, सोनाली ककुर्ले, प्राची पाटील यांचा अतिथींच्या हस्ते रोख व स्मृतिचिन्ह देवूून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)