शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन शक्य

By admin | Updated: June 26, 2014 23:28 IST

शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे

वर्धा : शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दलित मित्र एम.एन कासारे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कासारे बोलत होते. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जिल्हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत उपस्थित होत्या. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून छत्रपती शाहू महराजांनी विविध योजनांची आखणी केल्याचे सांगताना एम.एन.कासारे म्हणाले, समाजातील जातीभेद नष्ट करून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. आणि सामाजिक न्याय मिळवून दिला. समाजाचे प्रश्न सोडविताना विकासाची समान संधी दिली. त्यामुळेच सामाजिक व आर्थिक विकास शक्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना वंचितापर्यंत पोहचवून त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा. अपंग अथवा महिलांना समान संधी मिळावी त्यांना त्याचे हक्क मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. गोपाल कालेकर यांनीही सामाजिक न्याय हा सर्वांना समान असावा आणि समाजातील वंचितांचे प्रश्न सुटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सामाजिक न्याय दिनाचे दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. तसेच छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.यावेळी शालांत परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबद्दल गर्ल्स हायस्कूल आंजी येथील प्रगती विजय झपाटे, समीक्षा दीपक भगत, अमर दिनकर कोयरे, शिवानी सुधाकर गायकवाड, तसेच बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी मोनिका घडे, गजानन नेहरे, प्रणाली कांबळे, सोनाली ककुर्ले, प्राची पाटील यांचा अतिथींच्या हस्ते रोख व स्मृतिचिन्ह देवूून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)