शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

तीन वर्षांत ३.२ लाख वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:35 IST

वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देदोन महामार्गांसाठी १८ हजार झाडांवर चालली कुऱ्हाड : वर्धेकरांना भोगावे लागताहेत परिणाम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्धा जिल्ह्यातून जात असलेल्या दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार वृक्ष तोडण्यात आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे याचा विपरीत परिणाम जिल्ह्याच्या वातावरणावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्याची गरज आहे.मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. कधी नव्हे, एवढ्या भीषण जलसंकटाला वर्धेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात तोंड द्यावे लागले. तर पावसाळा सुरू होऊन एक महिना २२ दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यात नाममात्रच पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीसह विविध जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हे महत्त्वाचेच आहेत. परिणामी, प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे सांगण्यात येते. परंतु, गत तीन वर्षांत तब्बल ३.२ लाख डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याने याचा विपरीत परिणामच महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यावर होत आहेत. भविष्यातील संकट लक्षात घेत वृक्षारोपण आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे लावण्यात आलेली रोपटी जगविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आज गरजेचे आहे.५१.३ लाख रोपटे लावल्याचा केला जातोय गाजावाजा२ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात ७.६५ लाख, ४ कोटी वृक्षलागवड अंतर्गत १२.३८ लाख तर मागीलवर्षी ३१ लाख रोपटे वर्धा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लावण्यात आल्याचे आणि या झाडांपैकी ८५ टक्के रोपटे सध्या जिवंत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी प्रत्यक्षात किती रोपटे उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि उन्हाचा मारा सहन केल्यानंतर सध्या जिवंत आहेत, हा खरा संशोधनाचा विषय ठरत आहे.वृक्ष हे पाणी अडविणे आणि जिरविण्याचे महत्त्वाचे काम करते. मनुष्याला शुद्ध प्राणवायू देते. परंतु, मागील अनेक वर्षांपासून वृक्षतोड होत आहे. सध्या वृक्षारोपणाला महत्त्व दिले जात असले तरी प्रत्यक्षात वृक्षसंवर्धनासाठी भरीव कार्य होणे ही काळाची गरज आहे. लावण्यात आलेल्या रोपट्यांचे कमीत कमी दहा वर्ष संगोपन झाले पाहिजे. शिवाय, शासनानेही वृक्षारोपणासह वृक्षांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली पाहिजे.- मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा.वर्धा जिल्ह्यातून दोन मोठे महामार्ग जात आहेत. विदर्भाच्या विकासासाठी हे महामार्ग आवश्यक आहेत. विकासाला विरोध नाही. परंतु, याच दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर उघडकीस आली आहे. विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड कशी थांबविता येईल, यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे.- ताराचंद चौबे, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.