शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:59 IST

Wardha : एसएमएसचा निवडला अनेकांनी पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपूरक 'गो- ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिलेला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ते 'गो-ग्रीन' योजनेतील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. 'एसएमएस'द्वारे वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी आपला सहभाग नोंदविला असून, यात वर्धा मंडळामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई- मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन• 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.• ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला, तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल, तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

असे होता येईल योजनेत सहभागीमहावितरणच्या गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या करावी. याबाबतची अधिक माहिती mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलीअसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

बिलाच्या रंगीत प्रिंटचीही सोयवीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई- मेलद्वारे प्राप्त झाले दर महिन्याचे वीज बिल जतन करून ठेवतात.'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त वीज

ग्राहकांनी कागद विरहित वीज बिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे. जिल्हाभरातील सुमारे तीन हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.- प्रदीप घुरुडे, प्रभारी अधीक्षक अभियंता महावितरण, वर्धा.

 

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसीwardha-acवर्धा