शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:59 IST

Wardha : एसएमएसचा निवडला अनेकांनी पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपूरक 'गो- ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिलेला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ते 'गो-ग्रीन' योजनेतील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. 'एसएमएस'द्वारे वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी आपला सहभाग नोंदविला असून, यात वर्धा मंडळामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई- मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन• 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.• ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला, तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल, तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

असे होता येईल योजनेत सहभागीमहावितरणच्या गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या करावी. याबाबतची अधिक माहिती mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलीअसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

बिलाच्या रंगीत प्रिंटचीही सोयवीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई- मेलद्वारे प्राप्त झाले दर महिन्याचे वीज बिल जतन करून ठेवतात.'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त वीज

ग्राहकांनी कागद विरहित वीज बिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे. जिल्हाभरातील सुमारे तीन हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.- प्रदीप घुरुडे, प्रभारी अधीक्षक अभियंता महावितरण, वर्धा.

 

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसीwardha-acवर्धा