शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वीजजोडणीचे तीन हजार अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:41 IST

शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे जवळपास ३ हजार २७७ अर्ज वर्धा जिल्ह्यात प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.शेतीच्या ओलितासाठी कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने गेल्यावर्षीपासून बंद केले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी खोदल्या, शासकीय योजनेतून विहिरी मिळविल्या त्या शेतकºयांना आता ओलितासाठी विद्युत पुरवठा दिला जात नाही. महावितरणकडे या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. मात्र, त्यांचे अर्ज प्रलंबित पडून आहे. मार्च २०१८ पासून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज देणे बंद झाले असल्याने राज्यासह वर्धा जिल्ह्यातही शेतकरी अडचणीत आले आहे. महावितरणने सौर उर्जेच्या माध्यमातून कृषीपंपांना वीज पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेच्याद्वारे कृषीपंपांचे ओलित होऊ शकते. हे दाखविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काही ठराविक गावांमध्ये शेतकºयांच्या असे पंप लावून देण्यात आले आहे. ते शेतकरी इतर शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील पंपांद्वारे ओलित होऊ शकते, हे दाखवून देत आहे. त्यामुळे आता ३ ते ४ लाख छोट्या शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील पंप घ्यावा लागणार आहे. यातील ५ ते १० टक्के रक्कमही त्यांना भरावी लागेल. या योजनेतून कृषीपंपाची होणारी थकबाकीची कटकट महावितरण कंपनीकडे राहणार नाही. सौर उर्जेवरील पंपांमुळे शेतकऱ्यांना एकदा खर्च केल्यावर नेहमीसाठी मोफत वीज उपलब्ध होईल. २४ तास शेतीसाठी वीज पुरवठा सुरू राहील. त्यामुळे महावितरणाचे अधिकारी सौर कृषीपंपांचे महत्व शेतकऱ्यांना समजावून देत आहे. राज्यात सौर कृषीपंपासाठी सुमारे १.२७ लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. वर्धा जिल्ह्यातील १०० वर शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :electricityवीज