शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

केंद्र शासनाच्या सबको घर या योजनेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे नगर पालिकेला घरकूल मंजूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी राहात असलेले कच्चे घर तोडून घरकूल आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू केले. मात्र, केंद्र शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे अनेक दिवसांपासून घरकूलधारक पालिकेत येरझारा करीत आहेत.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या निधीअभावी लाभार्थ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेस केंद्र शासनाच्या निधी न मिळाल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. केंद्रात भाजप तर राज्यात सत्तापरिवर्तन होत महाविकास आघाडीचे सरकार आल्याने याचा फटका गोरगरिबांना बसत असल्याच चर्चा आहे.केंद्र शासनाच्या सबको घर या योजनेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे नगर पालिकेला घरकूल मंजूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी राहात असलेले कच्चे घर तोडून घरकूल आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू केले. मात्र, केंद्र शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे अनेक दिवसांपासून घरकूलधारक पालिकेत येरझारा करीत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना आवास योजनेचे बाकीचे पैसे कधी मिळतील, याबाबत विचारणा केली असता केंद्राचा निधी प्राप्त झाल्यावर वाटप केले जाईल, असे सांगितले जात आहे. केंद्र सरकार घरकुलांसाठी निधी देणार तरी कधी ? असा लाभार्थ्यांचा प्रश्न आहे.घरकुलांसाठी गोरगरिबांनी आपली राहती घरे पाडून उघड्यावर संसार थाटल्याचा केंद्र शासन गांभीर्यांने विचार करीत नसल्याच्या भावना लाभार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत. गरिबांचा विचार करून घरकुलाचा निधी त्वरित पाठवून गरिबांची चेष्टा थांबवावी, अशी अपेक्षा लाभार्थ्यांतून व्यक्त आहे.मुख्याधिकाऱ्यांना फोन घेण्याची ‘अ‍ॅलर्जी’पंतप्रधान आवास योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बातम्यांच्या अनुषंगाने त्यांच्याशी यापूर्वीही अनेकवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र कधीच प्रतिसाद दिला जात नाही, अशी पत्रकारांसह सर्वसामान्यांची ओरड आहे. जिल्हाधिकाºयांनी याची गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाकरिता निधी मिळत असल्याने अनेकांनी राहती घरे पाडली. मात्र, केंद्र शासनाकडून निधीच प्राप्त झालेला नाही. याविषयी लाभार्थी नगरपालिकेत संबंधितांकडे विचारणा करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना