शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभारीं’च्या खांद्यावरून शहरातील तीन महत्त्वाच्या कार्यालयांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे.

अरूण फाळकेलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : ग्रामीण भागासह शहराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाच्या कार्यालयांत नियमित कार्यालयप्रमुख अधिकारी असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण व शहरी व्यवस्थापन आणि कार्यालयाचा कारभार सुरळीत आणि गतिशीलपणे चालू शकतो. मात्र, कारंजा शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायतीच्या कार्यालयाला अनेक वर्षांपासून नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने या तिन्ही कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू आहे. यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र आहे. नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेणे, कर्मचाऱ्यांकडून शासकीय योजना राबवून घेणे, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी प्रभारी अधिकाऱ्यांना कठीण जाते. संबंधित कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून प्रमुख अधिकारीच नसल्याने कर्तव्य बजावताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम कामकाजावर होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे. सध्या या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. प्रभाकर वंजारी हे कामकाज सांभाळत आहे, तर ग्रामीण भागाच्या विकासाची नाळ ज्या कार्यालयाशी जुळली असते, असे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभारदेखील प्रभारी म्हणून कृषी अधिकारी पंधरे सांभाळत  आहेत. नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा कारभार ढेपाळला आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. अग्निशमन दलाबाबत ते निर्णय घेऊ शकले नाही. क्रीडा संकुल, अतिक्रमण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधकाम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था  ते करू शकले नाही, हे विशेष. याकडे प्रशासनाने लक्ष देत तत्काळ कायमस्वरुपी अधिकारी देण्याची गरज आहे.

मुख्यालयी राहण्यास अडचणी-    ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना वर्धा आणि नागपूर येथे अनेकदा मीटिंगला जावे लागत असल्याने ते आपल्या मूळ पदाला न्याय देऊ शकत नाहीत. सतत मुख्यालयी राहू शकत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज-    तिन्ही प्रमुख कार्यालयातील कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपला राजकीय प्रभाव वापरून तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदावर नियमित  अधिकाऱ्याची वर्णी लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

तालुक्यातील सर्वच विभागात बदलीचे ‘वारे’-    सध्या सर्वच विभागात बदलीचे वारे वाहू लागल्यामुळे या तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदांवर नियमित अधिकाऱ्यांची वर्णी लागेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप कुणाचाही आदेश निघाला नसल्याने सध्या तरी हा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून रामभरोसे सुरू राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल