शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

‘प्रभारीं’च्या खांद्यावरून शहरातील तीन महत्त्वाच्या कार्यालयांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे.

अरूण फाळकेलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : ग्रामीण भागासह शहराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाच्या कार्यालयांत नियमित कार्यालयप्रमुख अधिकारी असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण व शहरी व्यवस्थापन आणि कार्यालयाचा कारभार सुरळीत आणि गतिशीलपणे चालू शकतो. मात्र, कारंजा शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायतीच्या कार्यालयाला अनेक वर्षांपासून नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने या तिन्ही कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू आहे. यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र आहे. नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेणे, कर्मचाऱ्यांकडून शासकीय योजना राबवून घेणे, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी प्रभारी अधिकाऱ्यांना कठीण जाते. संबंधित कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून प्रमुख अधिकारीच नसल्याने कर्तव्य बजावताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम कामकाजावर होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे. सध्या या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. प्रभाकर वंजारी हे कामकाज सांभाळत आहे, तर ग्रामीण भागाच्या विकासाची नाळ ज्या कार्यालयाशी जुळली असते, असे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभारदेखील प्रभारी म्हणून कृषी अधिकारी पंधरे सांभाळत  आहेत. नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा कारभार ढेपाळला आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. अग्निशमन दलाबाबत ते निर्णय घेऊ शकले नाही. क्रीडा संकुल, अतिक्रमण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधकाम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था  ते करू शकले नाही, हे विशेष. याकडे प्रशासनाने लक्ष देत तत्काळ कायमस्वरुपी अधिकारी देण्याची गरज आहे.

मुख्यालयी राहण्यास अडचणी-    ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना वर्धा आणि नागपूर येथे अनेकदा मीटिंगला जावे लागत असल्याने ते आपल्या मूळ पदाला न्याय देऊ शकत नाहीत. सतत मुख्यालयी राहू शकत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज-    तिन्ही प्रमुख कार्यालयातील कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपला राजकीय प्रभाव वापरून तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदावर नियमित  अधिकाऱ्याची वर्णी लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

तालुक्यातील सर्वच विभागात बदलीचे ‘वारे’-    सध्या सर्वच विभागात बदलीचे वारे वाहू लागल्यामुळे या तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदांवर नियमित अधिकाऱ्यांची वर्णी लागेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप कुणाचाही आदेश निघाला नसल्याने सध्या तरी हा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून रामभरोसे सुरू राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल