शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार वृक्षांना आगीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:56 IST

शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले.

ठळक मुद्देनिसर्ग सेवा प्रकल्पात आग : काही वृक्ष होरपळले, टवाळखोरांचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविली. येथे नेहमीच टवाळखोराचा डेरा राहत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.आयटीआय कॉलेजच्या बाजुला असलेल्या टेकडीवर निसर्ग सेवा समितीने २००० पासून वृक्षांची लागवड व संगोपण केले. सध्या या परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड केली असून परिसर हिरवागार झाला आहे. निसर्ग सेवा समितीसह काही निसर्गप्रेमी आपल्या श्रमदानातून वृक्षांचे संगोपण करीत आहे; पण काही समाजकंटकांना ही हिरवळ पाहावली जात नाही की काय? असाच प्रश्न वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होत आहे. यापूर्वीही याच परिसरात आग लागल्याने वृक्षांचे नुकसान झाले. चार ते पाच दिवसापूर्वी हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाने तयार केलेल्या आॅक्सिजन पार्कमध्येही आग लागल्याने अनेक वृक्षांना झळ पोहोचली होती. आज पुन्हा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनीलगतच्या भागातील टेकडीवर आग लागल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे काहींनी आगीच्या दिशेने धाव घेत नगरसेवक निलेश किटे यांना माहिती दिली. किटे यांनी लागलीच न.प.चा अग्निशामन बंब पाठविला. त्यांनी टेकडीच्या खालच्या बाजुने पाण्याचा मारा करीत आग विझविली. त्यानंतर जलशुद्धी केंद्रालगतच्या वरील बाजुने जात आगीवर नियंत्रण मिळविले. पण, या आगीत जवळपास साडेतीन हजार वृक्षांना झळ पोहोचल्याचे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.पण, वारंवार होणाऱ्या घटनेमुळे यावर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.जलशुद्धी केंद्र परिसरात शुकशुकाटआयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकेंद्रालगतच्या परिसरात आग लागल्यानंतर अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. परंतु जलशुद्धीकेंद्र परिसरात शुकशुकाट होता. ही आग वरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दल तेथे पोहोचल्यानंतर सारेच धाऊन आले.निसर्ग सेवा प्रकल्पाच्या दर्शनी भागाला असलेल्या गेटमधून अग्निशमन बंब आत नेण्याकरिता गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

टॅग्स :fireआग