शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

साडेतीन हजार वृक्षांना आगीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:56 IST

शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले.

ठळक मुद्देनिसर्ग सेवा प्रकल्पात आग : काही वृक्ष होरपळले, टवाळखोरांचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविली. येथे नेहमीच टवाळखोराचा डेरा राहत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.आयटीआय कॉलेजच्या बाजुला असलेल्या टेकडीवर निसर्ग सेवा समितीने २००० पासून वृक्षांची लागवड व संगोपण केले. सध्या या परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड केली असून परिसर हिरवागार झाला आहे. निसर्ग सेवा समितीसह काही निसर्गप्रेमी आपल्या श्रमदानातून वृक्षांचे संगोपण करीत आहे; पण काही समाजकंटकांना ही हिरवळ पाहावली जात नाही की काय? असाच प्रश्न वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होत आहे. यापूर्वीही याच परिसरात आग लागल्याने वृक्षांचे नुकसान झाले. चार ते पाच दिवसापूर्वी हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाने तयार केलेल्या आॅक्सिजन पार्कमध्येही आग लागल्याने अनेक वृक्षांना झळ पोहोचली होती. आज पुन्हा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनीलगतच्या भागातील टेकडीवर आग लागल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे काहींनी आगीच्या दिशेने धाव घेत नगरसेवक निलेश किटे यांना माहिती दिली. किटे यांनी लागलीच न.प.चा अग्निशामन बंब पाठविला. त्यांनी टेकडीच्या खालच्या बाजुने पाण्याचा मारा करीत आग विझविली. त्यानंतर जलशुद्धी केंद्रालगतच्या वरील बाजुने जात आगीवर नियंत्रण मिळविले. पण, या आगीत जवळपास साडेतीन हजार वृक्षांना झळ पोहोचल्याचे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.पण, वारंवार होणाऱ्या घटनेमुळे यावर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.जलशुद्धी केंद्र परिसरात शुकशुकाटआयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकेंद्रालगतच्या परिसरात आग लागल्यानंतर अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. परंतु जलशुद्धीकेंद्र परिसरात शुकशुकाट होता. ही आग वरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दल तेथे पोहोचल्यानंतर सारेच धाऊन आले.निसर्ग सेवा प्रकल्पाच्या दर्शनी भागाला असलेल्या गेटमधून अग्निशमन बंब आत नेण्याकरिता गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

टॅग्स :fireआग