शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

‘त्या’ दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन

By admin | Updated: May 9, 2015 01:57 IST

पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता.

कारंजा (घाडगे) : पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता. त्यांच्या आरोपानुसार या मृतकांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. यावरुन शुक्रवारी या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याने दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ही बाब आता रहस्यमय बनली आहे. तालुक्यातील धावसा (हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२ ) व शैलेश करणाके (१४) या दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले. यावेळी डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपामुळे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी या दोघांचे मोक्यावर जात पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ़ पवन वानखेडे, डॉ़ संजय गाठे, डॉ़ बिसेन, डॉ शीतल सोलंकी यांनी शवविच्छेदन केले. यावेळी नायब तहसीलदार गणेश बर्वे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.तपासणीकरिता आलेल्या चमूने या दोघांच्या मृतदेहाचे व्हिसेरा घेत त्याची प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा अहवाल येण्यास काही दिवसाचा काळा लागणार असल्याने या दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट सांगता येत नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)