शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन

By admin | Updated: May 9, 2015 01:57 IST

पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता.

कारंजा (घाडगे) : पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता. त्यांच्या आरोपानुसार या मृतकांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. यावरुन शुक्रवारी या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याने दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ही बाब आता रहस्यमय बनली आहे. तालुक्यातील धावसा (हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२ ) व शैलेश करणाके (१४) या दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले. यावेळी डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपामुळे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी या दोघांचे मोक्यावर जात पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ़ पवन वानखेडे, डॉ़ संजय गाठे, डॉ़ बिसेन, डॉ शीतल सोलंकी यांनी शवविच्छेदन केले. यावेळी नायब तहसीलदार गणेश बर्वे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.तपासणीकरिता आलेल्या चमूने या दोघांच्या मृतदेहाचे व्हिसेरा घेत त्याची प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा अहवाल येण्यास काही दिवसाचा काळा लागणार असल्याने या दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट सांगता येत नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)