शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘त्या’ मुलांचे होणार पुन्हा शवविच्छेदन

By admin | Updated: May 2, 2015 00:09 IST

तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

संशय: पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यूकारंजा (घाडगे): तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश आर्वीचे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी दिले. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांनी घटनास्थळावर जात शवविच्छेदन करावे असे आदेशात नमूद आहे. सोबतच कारंजाचे नायब तहसीलदार व पोलीस निरिक्षकांनी प्रेत पुरलेल्या जागी जात पंचनामा करण्याचे आदेशात म्हटले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोरेश्वर व शैलेश या दोघांचा मृतदेह २४ मार्च २०१५ रोजी गावालगतच्या पाझर तलावात आढळून आला. दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मृतकांच्या पालकांनी त्यावेळी कोणताही संशय दर्शविलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर शवविच्छेदन करून पालकांनी अंत्यसंस्कार केले. मात्र त्याचा मृतदेह मिळण्यापूर्वी पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नोंदविलेल्या बयानानुसार मृतकांचे वडील व नातेवाईकांचे म्हणने नोंदविण्यात आले. यात मुलांच्या मृत्यूबाबत संशय दर्शविलेला आहे. त्यांच्या बयानानुसार दोन्ही मुले विद्युत करंटने मरण पावल्याची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. तसा अर्ज मृतकाच्या वडिलांनी कारंजा पोलिसात दिला आहे. या अर्जानुसार ३ मार्च २०१५ रोजी धावसा (हेटी) येथील कृष्णा बरखडे यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेल्या तारांत विद्युत प्रवाह असून त्यांच्या स्पर्शाने या दोघांचा मृत्यू झाला. पुरवा नष्ट करण्याकरिता दोघांचे प्रेत तलावात टाकल्याचे म्हणने आहे; मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यात संशय व्यक्त होत असल्याने दोन्ही मुलांचे पुन्हा शवविच्छेदन करून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर काय ते सत्य समोर येईल. याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)