शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

‘त्या’ बालकांचा पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागून मृत्यू

By admin | Updated: March 15, 2015 02:00 IST

धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़

वर्धा : धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़ यावरून पाण्यात बुडून बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद कारंजा पोलिसांनी केली; पण दोन्ही बालके पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागल्याने मरण पावली, असे मत पालकांनी व्यक्त केले़ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन सादर केले़ यात बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शैलेश मालजी करनाके (१४) आणि मोरेश्वर अनंता वझरकर (१२) ही दोघेही हरविल्याची तक्रार कारंजा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़ यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २४ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजता दोन्ही बालकांचे मृतदेह गावाजवळील पाझर तलावामध्ये आढळून आले़ त्यावेळी मालजी करनाके व अनंता वझरकर यांची मन:स्थिती बरोबर नव्हती़ दोन्ही मुले तलावात बुडून मरण पावली असावी, असेच सर्वांना वाटले; पण २५ फेब्रुवारीपासून गावात विद्युतचा धक्का लागल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात होती़ शिवाय दोन्ही बालकांचे मृतदेह दोन दिवस व दोन रात्री गव्हाच्या शेतात लपवून ठेवले व सोमवारी रात्री तलावात आणून टाकल्याचा संशय मृत बालकांच्या पालकांनी निवेदनातून व्यक्त केला आहे़ गावाला लागूनच असलेल्या शेतात नेहमीच शेतामध्ये धुऱ्याने तार लावून विद्युत प्रवाह सोडला जात असल्याची गावात चर्चा आहे़ यावरून दोन्ही बालकांचा मृत्यू तलावात बुडून नाही तर शेतातील विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने झाला व त्यांचे मृतदेह नंतर पाझर तलावात टाकले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे़ अत्यंसंस्काराच्या वेळी मुलांचे चेहरे व अंग पूर्ण काळे पडले होते़ यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे़ या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, शवविच्छेदन अहवाल पुन्हा तपासावा व पोलिसांना चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी मालजी करनाके व अनंता वझरकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)