शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘त्या’ बालकांचा पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागून मृत्यू

By admin | Updated: March 15, 2015 02:00 IST

धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़

वर्धा : धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़ यावरून पाण्यात बुडून बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद कारंजा पोलिसांनी केली; पण दोन्ही बालके पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागल्याने मरण पावली, असे मत पालकांनी व्यक्त केले़ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन सादर केले़ यात बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शैलेश मालजी करनाके (१४) आणि मोरेश्वर अनंता वझरकर (१२) ही दोघेही हरविल्याची तक्रार कारंजा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़ यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २४ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजता दोन्ही बालकांचे मृतदेह गावाजवळील पाझर तलावामध्ये आढळून आले़ त्यावेळी मालजी करनाके व अनंता वझरकर यांची मन:स्थिती बरोबर नव्हती़ दोन्ही मुले तलावात बुडून मरण पावली असावी, असेच सर्वांना वाटले; पण २५ फेब्रुवारीपासून गावात विद्युतचा धक्का लागल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात होती़ शिवाय दोन्ही बालकांचे मृतदेह दोन दिवस व दोन रात्री गव्हाच्या शेतात लपवून ठेवले व सोमवारी रात्री तलावात आणून टाकल्याचा संशय मृत बालकांच्या पालकांनी निवेदनातून व्यक्त केला आहे़ गावाला लागूनच असलेल्या शेतात नेहमीच शेतामध्ये धुऱ्याने तार लावून विद्युत प्रवाह सोडला जात असल्याची गावात चर्चा आहे़ यावरून दोन्ही बालकांचा मृत्यू तलावात बुडून नाही तर शेतातील विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने झाला व त्यांचे मृतदेह नंतर पाझर तलावात टाकले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे़ अत्यंसंस्काराच्या वेळी मुलांचे चेहरे व अंग पूर्ण काळे पडले होते़ यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे़ या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, शवविच्छेदन अहवाल पुन्हा तपासावा व पोलिसांना चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी मालजी करनाके व अनंता वझरकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)