शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ बालकांचा पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागून मृत्यू

By admin | Updated: March 15, 2015 02:00 IST

धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़

वर्धा : धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़ यावरून पाण्यात बुडून बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद कारंजा पोलिसांनी केली; पण दोन्ही बालके पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागल्याने मरण पावली, असे मत पालकांनी व्यक्त केले़ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन सादर केले़ यात बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शैलेश मालजी करनाके (१४) आणि मोरेश्वर अनंता वझरकर (१२) ही दोघेही हरविल्याची तक्रार कारंजा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़ यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २४ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजता दोन्ही बालकांचे मृतदेह गावाजवळील पाझर तलावामध्ये आढळून आले़ त्यावेळी मालजी करनाके व अनंता वझरकर यांची मन:स्थिती बरोबर नव्हती़ दोन्ही मुले तलावात बुडून मरण पावली असावी, असेच सर्वांना वाटले; पण २५ फेब्रुवारीपासून गावात विद्युतचा धक्का लागल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात होती़ शिवाय दोन्ही बालकांचे मृतदेह दोन दिवस व दोन रात्री गव्हाच्या शेतात लपवून ठेवले व सोमवारी रात्री तलावात आणून टाकल्याचा संशय मृत बालकांच्या पालकांनी निवेदनातून व्यक्त केला आहे़ गावाला लागूनच असलेल्या शेतात नेहमीच शेतामध्ये धुऱ्याने तार लावून विद्युत प्रवाह सोडला जात असल्याची गावात चर्चा आहे़ यावरून दोन्ही बालकांचा मृत्यू तलावात बुडून नाही तर शेतातील विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने झाला व त्यांचे मृतदेह नंतर पाझर तलावात टाकले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे़ अत्यंसंस्काराच्या वेळी मुलांचे चेहरे व अंग पूर्ण काळे पडले होते़ यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे़ या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, शवविच्छेदन अहवाल पुन्हा तपासावा व पोलिसांना चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी मालजी करनाके व अनंता वझरकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)