शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्रा पिकाचे उत्पादन घेतात. अशाच एका संत्रा उत्पादकाचा तोडणी केलेला पावणेदोन लाखांचा संत्रा चोरट्याने काळोखाचा फायदा घेत मालवाहूच्या साहाय्याने चोरून नेला. ही घटना मध्यरात्री तालुक्यातील खरसखांडा शिवारात घडली असून रविवारी सकाळी उघडकीस आली.खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.हिंदी आणि मराठी भाषेचा वापर करून संवाद साधणाऱ्या चोरट्यांनी ढीग करून असलेल्या सुमारे पाच टन संत्र्यापैकी तीन टन संत्रा मालवाहूत लादून चोरून नेला. चोरट्यांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्यावर घाबरलेल्या मजुरांनी स्वत:ला सावरत नासरे यांचे घर गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नासरे यांनी संत्राचोरीची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील तपास कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात प्रफुल्ल माहूर करीत आहेत.

परिसरात चोरट्यांची दहशत-   खरसखांडा येथे चक्क माजी सरपंचाच्या शेतातून संत्रा पळविण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा कारंजा पोलीस शोध घेत असले तरी या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चोरट्यांबाबत कमालीची दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :Thiefचोरagricultureशेती