शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

या चिमुकल्यांनो परत फिरा रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 14:35 IST

वर्धा जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.

ठळक मुद्देझेडपीच्या शाळेचे रूपडे पालटलेकॉन्व्हेंटच्या दहा विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालकांना असलेली कॉन्व्हेट संस्कृतीची ओढ मुलांना मराठी शाळांपासून दूर सारत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे उभे ठाकल्याने काही शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. अशाही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर शाळेची गुणवत्ता सुधारली. याच परिवर्तनामुळे कधीकाळी कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोल्ही या गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागातील हे गाव आहे. या शाळेतील शिक्षक स्वयंप्रेरणेने विविध प्रयत्न करीत असल्याने या स्पर्धेच्या युगातही ही जिल्हा परिषदेची शाळा तग धरून आहे.इतकेच नव्हे, तर मागील पाच ते सात वर्षांपासून जिल्ह्याच्या गुणवत्तेचे रूप संपूर्ण महाराष्ट्राला दाखविणारी एक आदर्श शाळा ठरली आहे. या शाळेमध्ये उत्कृष्ट हस्ताक्षर, ज्ञानरचनावादी व डिजिटल शिक्षण, नवोदय-शिष्यवृत्ती वर्ग, बागेतील उपक्रम, अस्खलिखित इंग्रजी बोलणारे आणि दोन्ही हातांनी लिहिणारे विद्यार्थी, ही या शाळेची विशेष ओळख आहे.शाळेचे पालटलेले हे रूपडे अनेकांना खुणावत आहे. त्यामुळे यावर्षी या शाळेत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.पटसंख्या टिकविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करायच्या दिवसात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे आणि सहाय्यक अध्यापिका दीपाली भापकर परिश्रम घेत आहेत.शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळाहिंगणघाट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या शाळेने शिक्षकांच्या कल्पकतेमुळे कात टाकली आहे. शाळा सुधारणेचे माध्यम ठरतात, याची प्रचिती या गावात आली आहे. शिक्षकांनी शाळेची स्थिती सुधारून आदर्श निर्माण करताच गावाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला. मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यामुळे गावकऱ्यांनीही पुढाकार घेत या शिक्षकांच्या सहाय्याने गावात स्वच्छता अभियान व इतर उपक्रम राबवून चेहरामोहरा बदलविला. यावरून शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळा ही संकल्पना येथे पूर्णत्वास गेली आहे.आमदारांनी शाळा घेतली दत्तकमागील काही वर्षात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शाळेपर्यंत पोहोचण्याकरिता रस्त्याची अडचण असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. नजीकच्या शेकापूर येथील शाळेत पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थी कोल्हीच्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छितात. पण, रस्त्याअभावी ते विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. याकरिता रस्त्याचे बांधकाम करण्याची गरज आहे.हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी या शाळेची भरारी पाहून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी शाळा दत्तक घेतली. त्यामुळे या शाळेत आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची पूर्तता ते करीत आहे. शेकापूर ते कोल्ही रस्ता मंजूर करून शाळा प्रवेशासाठी दारे खुली करून दिली आहेत.येथील मुलांना कसे शिकविले जाते, शाळेचा परिसर कसा रंगविलेला आहे, एकच मुलगा दोन्ही हाताने एकाच वेळी कसा काय लिहू शकतो, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत या शाळेला भेटी दिल्या आहेत. अनेकांकडून या शाळेकरिता मदतीचा ओघही वाढला आहे.

गुणवत्तेसोबतच राबवत असलेले उपक्रम व त्याची युट्यूब, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे केलेली प्रसिद्धी हे शाळेच्या यशाचे गमक आहे. शाळेला भेट देणाºया लोकांची संख्या वाढल्याने गावकºयांनी आपले गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करून इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे. शाळेला केंद्र प्रमुख विजया ढगे यांचे मार्गदर्शन तसेच आमदार समीर कुणावार यांचे सहकार्य मिळत आहे.-दीपाली भापकर, सहाय्यक अध्यापिका, जि.प.शाळा,कोल्ही

टॅग्स :Schoolशाळा