शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

या चिमुकल्यांनो परत फिरा रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 14:35 IST

वर्धा जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.

ठळक मुद्देझेडपीच्या शाळेचे रूपडे पालटलेकॉन्व्हेंटच्या दहा विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालकांना असलेली कॉन्व्हेट संस्कृतीची ओढ मुलांना मराठी शाळांपासून दूर सारत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे उभे ठाकल्याने काही शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. अशाही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर शाळेची गुणवत्ता सुधारली. याच परिवर्तनामुळे कधीकाळी कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोल्ही या गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागातील हे गाव आहे. या शाळेतील शिक्षक स्वयंप्रेरणेने विविध प्रयत्न करीत असल्याने या स्पर्धेच्या युगातही ही जिल्हा परिषदेची शाळा तग धरून आहे.इतकेच नव्हे, तर मागील पाच ते सात वर्षांपासून जिल्ह्याच्या गुणवत्तेचे रूप संपूर्ण महाराष्ट्राला दाखविणारी एक आदर्श शाळा ठरली आहे. या शाळेमध्ये उत्कृष्ट हस्ताक्षर, ज्ञानरचनावादी व डिजिटल शिक्षण, नवोदय-शिष्यवृत्ती वर्ग, बागेतील उपक्रम, अस्खलिखित इंग्रजी बोलणारे आणि दोन्ही हातांनी लिहिणारे विद्यार्थी, ही या शाळेची विशेष ओळख आहे.शाळेचे पालटलेले हे रूपडे अनेकांना खुणावत आहे. त्यामुळे यावर्षी या शाळेत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.पटसंख्या टिकविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करायच्या दिवसात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे आणि सहाय्यक अध्यापिका दीपाली भापकर परिश्रम घेत आहेत.शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळाहिंगणघाट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या शाळेने शिक्षकांच्या कल्पकतेमुळे कात टाकली आहे. शाळा सुधारणेचे माध्यम ठरतात, याची प्रचिती या गावात आली आहे. शिक्षकांनी शाळेची स्थिती सुधारून आदर्श निर्माण करताच गावाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला. मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यामुळे गावकऱ्यांनीही पुढाकार घेत या शिक्षकांच्या सहाय्याने गावात स्वच्छता अभियान व इतर उपक्रम राबवून चेहरामोहरा बदलविला. यावरून शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळा ही संकल्पना येथे पूर्णत्वास गेली आहे.आमदारांनी शाळा घेतली दत्तकमागील काही वर्षात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शाळेपर्यंत पोहोचण्याकरिता रस्त्याची अडचण असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. नजीकच्या शेकापूर येथील शाळेत पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थी कोल्हीच्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छितात. पण, रस्त्याअभावी ते विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. याकरिता रस्त्याचे बांधकाम करण्याची गरज आहे.हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी या शाळेची भरारी पाहून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी शाळा दत्तक घेतली. त्यामुळे या शाळेत आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची पूर्तता ते करीत आहे. शेकापूर ते कोल्ही रस्ता मंजूर करून शाळा प्रवेशासाठी दारे खुली करून दिली आहेत.येथील मुलांना कसे शिकविले जाते, शाळेचा परिसर कसा रंगविलेला आहे, एकच मुलगा दोन्ही हाताने एकाच वेळी कसा काय लिहू शकतो, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत या शाळेला भेटी दिल्या आहेत. अनेकांकडून या शाळेकरिता मदतीचा ओघही वाढला आहे.

गुणवत्तेसोबतच राबवत असलेले उपक्रम व त्याची युट्यूब, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे केलेली प्रसिद्धी हे शाळेच्या यशाचे गमक आहे. शाळेला भेट देणाºया लोकांची संख्या वाढल्याने गावकºयांनी आपले गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करून इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे. शाळेला केंद्र प्रमुख विजया ढगे यांचे मार्गदर्शन तसेच आमदार समीर कुणावार यांचे सहकार्य मिळत आहे.-दीपाली भापकर, सहाय्यक अध्यापिका, जि.प.शाळा,कोल्ही

टॅग्स :Schoolशाळा