शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

वर्धा शहरात दहा दिवस नळाला येणार नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनालवाडी परिसरात खोदकामात मुख्य जलवाहिनी फुटली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी नालवाडी परिसरात खोदकाम केले जात आहे. याच खोदकामादरम्यान वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तसेच दुरूस्तीच्या कामाला सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुढील दहा दिवस वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प.द्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे पालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु, दुरूस्तीचे काम वेळखाऊ आणि जिकीरीचे असल्याने ते पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामाला सध्या ब्रेक लागला असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.दुरुस्तीचे साहित्य बोलविले नागपुरातूनजलवाहिनी दुरूस्तीचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी सध्या वर्धा नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. लिकेज झालेली मुख्य जलवाहिनी जुनी असल्यामुळे पुुरेशी काळजी घेऊन दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी लागणारे आवश्यक पाईप व इतर सुटे भाग नागपूर येथून बोलविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा राहणार बंदवर्धा न.प. प्रशासनाकडून युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम होत असले तरी सुदामपुरी, मोहिनीनगर, नागपूर रोड, यशवंत कॉलनी, हिमालय विश्व, स्नेहलनगर, विद्यानगर, लक्ष्मीनगर, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन, महादेव पुरा, इतवारा, पुलफैल, आनंदनगर, गोंड प्लॉट, पोलीस वसाहत येथील पाणी पुरवठा पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आय.टी.आय टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथून वर्धा शहरातील नागरिकांना शक्य झाल्यास तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.

सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जलवाहिनी दुरूस्तीचे काम केले जात आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी खोदकाम केले असता ११ केव्हीची विद्युत वाहिनीही असल्याचे पुढे आले आहे. दुरूस्तीच्या कामात काही अडचणी येऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागणार असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा.

टॅग्स :Waterपाणी