शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वर्धा शहरात दहा दिवस नळाला येणार नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनालवाडी परिसरात खोदकामात मुख्य जलवाहिनी फुटली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी नालवाडी परिसरात खोदकाम केले जात आहे. याच खोदकामादरम्यान वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तसेच दुरूस्तीच्या कामाला सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुढील दहा दिवस वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प.द्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे पालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु, दुरूस्तीचे काम वेळखाऊ आणि जिकीरीचे असल्याने ते पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामाला सध्या ब्रेक लागला असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.दुरुस्तीचे साहित्य बोलविले नागपुरातूनजलवाहिनी दुरूस्तीचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी सध्या वर्धा नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. लिकेज झालेली मुख्य जलवाहिनी जुनी असल्यामुळे पुुरेशी काळजी घेऊन दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी लागणारे आवश्यक पाईप व इतर सुटे भाग नागपूर येथून बोलविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा राहणार बंदवर्धा न.प. प्रशासनाकडून युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम होत असले तरी सुदामपुरी, मोहिनीनगर, नागपूर रोड, यशवंत कॉलनी, हिमालय विश्व, स्नेहलनगर, विद्यानगर, लक्ष्मीनगर, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन, महादेव पुरा, इतवारा, पुलफैल, आनंदनगर, गोंड प्लॉट, पोलीस वसाहत येथील पाणी पुरवठा पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आय.टी.आय टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथून वर्धा शहरातील नागरिकांना शक्य झाल्यास तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.

सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जलवाहिनी दुरूस्तीचे काम केले जात आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी खोदकाम केले असता ११ केव्हीची विद्युत वाहिनीही असल्याचे पुढे आले आहे. दुरूस्तीच्या कामात काही अडचणी येऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागणार असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा.

टॅग्स :Waterपाणी