शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वर्धा शहरात दहा दिवस नळाला येणार नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनालवाडी परिसरात खोदकामात मुख्य जलवाहिनी फुटली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी नालवाडी परिसरात खोदकाम केले जात आहे. याच खोदकामादरम्यान वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तसेच दुरूस्तीच्या कामाला सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुढील दहा दिवस वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प.द्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे पालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु, दुरूस्तीचे काम वेळखाऊ आणि जिकीरीचे असल्याने ते पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामाला सध्या ब्रेक लागला असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.दुरुस्तीचे साहित्य बोलविले नागपुरातूनजलवाहिनी दुरूस्तीचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी सध्या वर्धा नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. लिकेज झालेली मुख्य जलवाहिनी जुनी असल्यामुळे पुुरेशी काळजी घेऊन दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी लागणारे आवश्यक पाईप व इतर सुटे भाग नागपूर येथून बोलविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा राहणार बंदवर्धा न.प. प्रशासनाकडून युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम होत असले तरी सुदामपुरी, मोहिनीनगर, नागपूर रोड, यशवंत कॉलनी, हिमालय विश्व, स्नेहलनगर, विद्यानगर, लक्ष्मीनगर, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन, महादेव पुरा, इतवारा, पुलफैल, आनंदनगर, गोंड प्लॉट, पोलीस वसाहत येथील पाणी पुरवठा पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आय.टी.आय टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथून वर्धा शहरातील नागरिकांना शक्य झाल्यास तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.

सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जलवाहिनी दुरूस्तीचे काम केले जात आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी खोदकाम केले असता ११ केव्हीची विद्युत वाहिनीही असल्याचे पुढे आले आहे. दुरूस्तीच्या कामात काही अडचणी येऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागणार असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा.

टॅग्स :Waterपाणी