शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

धर्माच्या नावावर आर्वी शहरात कधीही दंगे झाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:10 IST

धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर दिवे : यंग मुस्लीम वेलफेअरचा सत्कार समारंभ

ऑनलाईन लोकमतआर्वी : धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.यंग मुस्लीम वेलफेअर असो. च्या वतीने गांधी चौकात आतंकवाद विरोधी परिषदेद्वारे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते सत्काराला उत्तर देत होते. ते पूढे म्हणाले की, सर्व धर्म, पंथ व जातीचे लोक एकाच ठिकाणावर नतमस्तक होऊन एकतेचा संदेश देणाऱ्या तेलंगराय बाबांच्या कर्मभूमीत माझा जन्म झाला. याच ठिकाणी असलेल्या दर्ग्यालगत माझा सत्कार करण्यात आला, हे भाग्य समजतो. शासकीय सेवेत असताना १९९१ साली मी नागपूर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशातील उत्कृष्ट शासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यापेक्षाही मोठा आनंद आज माझ्या कर्मभूमीत झालेल्या सत्कारामुळे झाल्याचेही दिवे यांनी सांगितले.आतंकवाद हा देश आणि मानव समाजाकरिता धोका आहे, या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलरत्न पुरस्कार प्राप्त रमेशचंद्र राठी तर अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे उपस्थित होते.जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. गारीब अहमद म्हणाले की, विविधतेने नटलेल्या भारत देशातील सर्व जाती, पंथात सकारात्मक भावना निर्माण झाली तर एकोपा वाढेल. मानव समाजाकरिता घातक असलेल्या आतंकवाद देशातूनच नव्हे तर जगातून समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आतंकवाद म्हटला की एका समाजाचे नाव पुढे येते; पण देशाची फाळणी झाल्यापासून त्या समाजाची नाळ भारत देशासोबत जुळली आहे, हे का विसरत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही द्वेशभावना निर्माण करण्याकरिता प्रसार माध्यमातून प्रसारित होणारी नकारात्मक भूमिका कारणीभूत असून त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विशेष कार्य. अधिकारी केंद्रीय मंत्री जलसंपदा नदी विकास व गंगा पुनर्जीवन सुधीर दिवे, समाजसेवक श्रीधर ठाकरे, अभियंता निलेश गायकवाड, तहसीलदार विजय पवार, ठाणेदार अशोक चौधरी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन वेलफेअरचे अध्यक्ष नजीर खान रिजवी यांनी केले. कार्यक्रमाला परवेज अहमद साबीर, मोहम्मद अगाजउद्दीन, मोहम्मद एजाज अंसारी, मोहम्मद सरफराज नागोरी, अब्दुल रफीक, सदस्य आरिफ नागोरी, ईस्माईल खान, शेख कलीम कुरेशी, शेख जब्बार, सैय्यद जुबरे, रिजवान अहमद, शेख समीर, मिर्झा अश्पाक बेग यांनी सहकार्य केले.