शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात खादीच्या राख्यांची परंपरा कायम

By admin | Updated: August 29, 2015 02:14 IST

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात;...

५०० राख्यांची निर्मिती: महात्मा गांधींच्या विचारानुसार शिक्षणाचा प्रयत्नदिलीप चव्हाण सेवाग्रामभारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात; मात्र महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम आश्रमात खादीच्या सूताच्या राख्या तयार करून त्या बांधण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ती आताही कायम असल्याचे चित्र आहे. येथील आनंद निकेतन विद्यालयामध्ये विद्यार्थी सूतापासून तयार केलली राखी बांधून रक्षाबंधन साजरे करीत असल्याचे दिसून आले आहे. सन १९३८ पासून महात्मा गांधीजींच्या विचार तत्त्वावर आणि अध्ययनावरून नव्या शिक्षण प्रयोगाला प्रारंभ झाला. याची संपूर्ण जबाबदारी इ.डब्ल्यू आर्यनायकम व आशादेवी या दाम्पत्यावर होती. हिंदुस्थानी तालिमी संघ नंतर नई तालिम व आताचा आनंद निकेतन असा थोडा बदल झाला. नई तालीम ही शिक्षण पद्धती नसून संपूर्ण जीवन शैलीची विचारधारा आहे. अहिंसक समाज रचनेतून आदर्श नागरिक निर्माण होवू शकतात. कामाद्वारे शिक्षण प्रणाली असली तरी यात सांस्कृतिक आणि कलेला फार महत्त्व आहे. आपल्या संस्कृती व सणांचे ज्ञान विविध कार्यक्रम व सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत होते. रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने शाळेतच नव्हे तर संस्थेत साजरा केल्या जात होता. शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी खादी सुताला रंग देणे, साधी तसेच रंगीत राख्या बनविण्यात मग्न होवून जातात. काही तर आपल्या कल्पकतेने सुंदर राख्या बनवून शाबासकीही मिळवितात. रक्षाबंधनदिनी गाणी गायली जातात. विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांना राखी बांधून या सणाचे महत्त्व विषद केल्या जात होते. समिती आणि आनंद निकेतन विद्यालयाने ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. १५ दिवसांपासून सूतकताईला प्रारंभ सेवाग्राम आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन येथे राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला रक्षाबंधनाच्या १५ दिवसांपूर्वीपासून सुरुवात होते. यात शाळेतील वर्ग ३ ते ९ पर्यंतचे सर्वच विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सूताच्या माध्यमातून राख्या तयार करण्यात येत असतात. या राख्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत. या राख्या १० ते २० रुपयांपर्यंत विक्रीला ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांनी ५०० राख्या तयार केल्या आहेत. त्यापैकी ३०० राख्या विकल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका असा संदेशही दिल्या जात आहे.