शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
5
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
6
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
7
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
8
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
9
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
10
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
11
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
12
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
13
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
14
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
15
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
16
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
17
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
18
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
19
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
20
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर

कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

By admin | Updated: June 14, 2016 01:39 IST

पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर

विरूळ (आकाजी) : पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; पण सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही अडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ते कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत आहेत.सध्या सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शासनाच्यावतीने नव्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. तयार असलेल्या या कोल्हापुरी बंधाऱ्याला जलयुक्त शिवार अभियानात पुन्हा जिवंत केल्यास त्याचा लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे बोलले जात आहे. याचा विचार जलयुक्त शिवार अभियान राबविणाऱ्या यंत्रणेने करणे गरजेचे आहे. तत्सम मागणीही शेतकरी करीत आहेत; पण याकडेही दुर्लक्षच होताना दिसून येत आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. नदी, नाल्या लगतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, परिसरातील भूजल पातळी वाढावी, शेतकऱ्यांच्या पिकांचा, गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी नदी वा नाल्याच्या पात्रात कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना होती. या योजनेत तालुक्यात अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण या बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याचे दिसते. यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी चौकशी करावी व बंधारे उपयोगी आणावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)तांत्रिक अडचणीमुळे बंधारे कुचकामी ४कृषी विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात कोणत्याही तांत्रिक अभियंत्याचा सल्ला घेण्यात आला नाही. कोणत्याही सिमेंटच्या कामात तांत्रिक अभियंत्याची गरज असते. त्याचा सल्ला व देखरेखीत कामे करण्यात येत असतात; पण कृषी विभागाने बंधारे बांधताना तांत्रिक सल्लाच घेतला नाही. यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची काम झाल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.