शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

By admin | Updated: June 14, 2016 01:39 IST

पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर

विरूळ (आकाजी) : पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; पण सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही अडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ते कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत आहेत.सध्या सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शासनाच्यावतीने नव्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. तयार असलेल्या या कोल्हापुरी बंधाऱ्याला जलयुक्त शिवार अभियानात पुन्हा जिवंत केल्यास त्याचा लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे बोलले जात आहे. याचा विचार जलयुक्त शिवार अभियान राबविणाऱ्या यंत्रणेने करणे गरजेचे आहे. तत्सम मागणीही शेतकरी करीत आहेत; पण याकडेही दुर्लक्षच होताना दिसून येत आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. नदी, नाल्या लगतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, परिसरातील भूजल पातळी वाढावी, शेतकऱ्यांच्या पिकांचा, गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी नदी वा नाल्याच्या पात्रात कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना होती. या योजनेत तालुक्यात अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण या बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याचे दिसते. यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी चौकशी करावी व बंधारे उपयोगी आणावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)तांत्रिक अडचणीमुळे बंधारे कुचकामी ४कृषी विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात कोणत्याही तांत्रिक अभियंत्याचा सल्ला घेण्यात आला नाही. कोणत्याही सिमेंटच्या कामात तांत्रिक अभियंत्याची गरज असते. त्याचा सल्ला व देखरेखीत कामे करण्यात येत असतात; पण कृषी विभागाने बंधारे बांधताना तांत्रिक सल्लाच घेतला नाही. यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची काम झाल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.