शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

By admin | Updated: June 14, 2016 01:39 IST

पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर

विरूळ (आकाजी) : पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; पण सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही अडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ते कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत आहेत.सध्या सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शासनाच्यावतीने नव्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. तयार असलेल्या या कोल्हापुरी बंधाऱ्याला जलयुक्त शिवार अभियानात पुन्हा जिवंत केल्यास त्याचा लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे बोलले जात आहे. याचा विचार जलयुक्त शिवार अभियान राबविणाऱ्या यंत्रणेने करणे गरजेचे आहे. तत्सम मागणीही शेतकरी करीत आहेत; पण याकडेही दुर्लक्षच होताना दिसून येत आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. नदी, नाल्या लगतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, परिसरातील भूजल पातळी वाढावी, शेतकऱ्यांच्या पिकांचा, गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी नदी वा नाल्याच्या पात्रात कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना होती. या योजनेत तालुक्यात अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण या बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याचे दिसते. यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी चौकशी करावी व बंधारे उपयोगी आणावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)तांत्रिक अडचणीमुळे बंधारे कुचकामी ४कृषी विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात कोणत्याही तांत्रिक अभियंत्याचा सल्ला घेण्यात आला नाही. कोणत्याही सिमेंटच्या कामात तांत्रिक अभियंत्याची गरज असते. त्याचा सल्ला व देखरेखीत कामे करण्यात येत असतात; पण कृषी विभागाने बंधारे बांधताना तांत्रिक सल्लाच घेतला नाही. यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची काम झाल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.