शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

भविष्यात परकीय भांडवलाची गरज नाही

By admin | Updated: March 23, 2015 01:54 IST

सन २०१५ च्या अर्थसंकल्पात बेरोजगारी, शेती व लघुउद्योगांकरिता विशेष तरतूद करण्यात आली. त्यामुळे आता देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकरिता

वर्धा : सन २०१५ च्या अर्थसंकल्पात बेरोजगारी, शेती व लघुउद्योगांकरिता विशेष तरतूद करण्यात आली. त्यामुळे आता देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकरिता परकीय भांडवलाची गरज भासणार नाही, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. योगानंद काळे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीला काय मिळाले आणि काय हिसकावले यावर मर्यादित न राहता अर्थसंकल्प कसा आहे, यावर चर्चा होणे अपेक्षित असते. १९८४ नंतर भारतात एका पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यान, युपीए असो की एनडीए, यांनी कुबड्या घेऊनच सरकार चालविले़ २०१५ च्या अंर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ६४ टक्के सेवाकर लावण्यात आला. रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योग क्षेत्राचा दर २१ टक्क्यांवर आणला. देशात ५ टक्के तरूण नोकरीकरिता पात्र नसल्याने त्यांच्याकरिता कौशल्यावर आधारित उद्योग निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक स्पर्धेत उद्योजकांची हिंमत वाढावी म्हणून कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून २५ टक्के करण्यात आल्याचेही डॉ. काळे यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा वाढत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेचा वेग वाढत नसल्याने या अर्थसंकल्पात ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ५ हजार मेगावॅटचे ५ मोठे वीजप्रकल्पही उभारण्यात येणार असून २०२२ पर्यंत प्रत्येक घरात वीज देण्याचा निर्धार अर्थसंकल्पात आहे़ लघु उद्योगांकरिता मुद्रा बँकेची स्थापना करून २० हजार कोटींचे भांडवल उपलब्ध करून दिले. सरकारी कार्यालयांत ४ टक्के वस्तु लघु उद्योजकांकडून घेतल्या जाव्या, अशी तरतूद केल्याचे सांगितले़ वर्धा नागरी बँक व भारतीय विचार मंचाद्वारे शनिवारी माधव भवनात ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी पूर्ती उद्योग समूहाचे प्रबंध संचालक सुधीर दिवे तर अतिथी म्हणून बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, अशोक पांडे, भारतीय विचार मंचाचे सुधीर येळकर उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)